शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

26/11 Terror Attack : मुंबई पोलिसांसाठी लंडनच्या 'सुपरफास्ट' बोटी, सागरी सुरक्षेला बळकटी

By पूनम अपराज | Updated: November 16, 2018 19:22 IST

नव्या अत्याधुनिक ('इमिजिएट सपोर्ट व्हेईकल') बोटी 'राॅयल इन्स्टिट्यूशन आॅफ नेव्हल आर्किटेक्ट' या कंपनीकडून येणार आहे. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे.

ठळक मुद्दे२००९ मध्ये १५ सी लेक बोटी न्यूझीलंडहून मागवल्या होत्यानव्या अत्याधुनिक ('इमिजिएट सपोर्ट व्हेईकल') बोटी 'राॅयल इन्स्टिट्यूशन आॅफ नेव्हल आर्किटेक्ट' या कंपनीकडून येणार मुंबईवर केलेल्या २६/११ च्या हल्यानंतर २००९ साली मुंबई पोलीस दलात 'फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस'करिता १५ स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या होत्या

मुंबई - मुंबईसह देशाला हादरून टाकणाऱ्या २६/११ च्या थरारक दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत आहे. समुद्रमार्गे दहा दहशतवादी मुंबईत घुसले आणि त्यांनी मुंबईला लक्ष्य करत अनेक निष्पापांचे प्राण घेतले. या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समुद्र सुरक्षेसाठी २००९ मध्ये १५ सी लेक बोटी न्यूझीलंडहून मागवल्या होत्या. या बोटींना आता ९ वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर या उपलब्ध बोटींबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी नव्या हायस्पीड आणि अत्याधुनिक बोटींची मागणी राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकार लवकरच या बोटी मुंबईच्या समुद्रात गस्तीसाठी दाखल करणार आहे. या नव्या अत्याधुनिक ('इमिजिएट सपोर्ट व्हेईकल') बोटी 'राॅयल इन्स्टिट्यूशन आॅफ नेव्हल आर्किटेक्ट' या कंपनीकडून येणार आहे. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. या बोटींद्वारे २०० नाॅटीकल माईल खोल समुद्रात गस्त घालणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून या बोटीतून एकाच वेळी ३४ जण प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे समुद्रात सात दिवस ही बोट थांबू शकते. सध्या ही बोट ओएनजीसी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. ओएनजीसीने ही बोट पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतली असून त्याचे दिवसाचे भाडे १ लाख ७० हजार इतके आहे. या बोटी लवकरच राज्य पोलीस दलात दाखल होणार असून त्यामुळे समुद्री सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

२६/११ मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतरही गेल्या नऊ वर्षांमध्ये सागरी सुरक्षेत फारशी अशी प्रगती झालेली नाही. मुंबईसह राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र, या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केवळ २१ सागरी पोलीस ठाणे आहेत. ५ पोलीस ठाणी मुंबईत तर ५ ठाणे ग्रामीण, ५ रायगड जिल्हा, ६ सिंधुदर्ग आणि ५ रत्नागिरी जिल्ह्यात तर ३६ कोस्टल चौक्या, २२ नौका आणि ७ स्पीड बोटी आहेत. मात्र, सागरी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या बहुतांश साधनंही जुनी आणि नादुरुस्तच आहेत. समुद्रमार्गे घुसून मुंबईवर केलेल्या २६/११ च्या हल्यानंतर २००९ साली मुंबई पोलीस दलात 'फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस'करिता १५ स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. या बोटींद्वारे पोलीस हे समुद्रात गस्त घालत होते. मात्र, काही दिवसांनी या बोटींची क्षमता कमी असल्यामुळे गस्त घालण्यात अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. या बोटी ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने पाण्यात जरी धावू शकत असल्या तरी ५ नाॅटीकल अंतरापेक्षा त्या खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या. उथळ समुद्रात या बोटी पाण्यात थांबू शकत नाहीत. तसेच ४ ते ५ तासाहून अधिक वेळ त्या पाण्यात थांबू शकत नव्हत्या. त्यातच १६ पेक्षा जास्त मनुष्यबळ त्या वाहून नेऊ शकत  नव्हत्या. या बाबींचा विचार करून सागरी  सुरक्षा अधिक प्रभावी बनवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला