शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

कर्ज देण्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा; डायघर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:47 IST

पाच मोबाइलसह काही कागदपत्रेही जप्त केली असून त्यांच्या विविध बँक खात्यातील सुमारे पाच लाख रूपये गोठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : शून्य व्याज दराने बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून शंभरहून अधिक जणांना सुमारे दीड कोटींचा गंडा घालणाऱ्या दीपक सिंग (३० रा. नालासोपारा), मारु ती शेलार (२८ रा. भांडूप), दीपक गिरी (२१ रा. ठाणे) आणि इमतीयाज कुरेशी (२८ रा. वागळे इस्टेट) या चौघांना शीळ डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच मोबाइलसह काही कागदपत्रेही जप्त केली असून त्यांच्या विविध बँक खात्यातील सुमारे पाच लाख रूपये गोठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.दीपक सिंग या सूत्रधाराने त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या मदतीने नौपाड्यातील एका कॉल सेंटरमधून फोन करून अनेकांना शून्य व्याजाच्या अमिषावर कर्ज देण्याचे अमिष दाखविले. कर्जासाठी समोरील व्यक्ती तयार झाल्यानंतर त्यांच्याकडून दहा हजार रुपये तर कोणाकडून ५० हजार रुपये ही टोळी वेगवेगळ्या कारणाखाली घेत होती. यास्मीन राजानी (५३) यांनाही त्यांनी शून्य व्याज दराने सहा लाखांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून चार लाख ७५ हजार रुपये उकळले होते. त्याबदल्यात त्यांना कोणतेही कर्ज न देता त्यांची फसवणूक केली.२ जुलै २०१८ रोजी याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जावळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय पाटील यांच्या पथकांनी १९ जुलै रोजी सूत्रधार दीपक सिंग आणि मारुती शेलार या दोघांना तर २० जुलै रोजी इतर दोघांना अटक केली. त्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर २६ ते ३० जुलै दरम्यान चितळसर पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला.आरोपींनी तक्रारदार महिलेशी विजय पाटील, रियाज सिद्धिकी, श्रेया देसाई, रिटा कुलकर्णी अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करून त्यांच्याकडून कधी फीचे तर कधी जीएसटीच्या नावाखाली पैसे काढले. त्याअनुषगाने पोलिसांनी तपास करून नौपाड्यातील रूक्मिणी इमारतीमधील कॉल सेंटरवर छापा टाकून या चौघांना अटक केली. कागदपत्रे, डायरी, हार्डडिस्कवरून या आरोपींनी सुमारे १०५ हून अधिक गरजूंची दीड कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.अशा प्रकारच्या फसवणुकीप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील चितळसर मानपाडा, कोळशेवाडी, मुंब्रा, विष्णूनगर तसेच मुंबईतील एलटी मार्ग पोलिस ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीणमधील टिटवाळा, पालघर जिल्ह्यातील तुळींज, नवी मुंबईतील तुर्भे, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून अनेकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तक्रारदारांनी शीळ डायघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. यात चौघांना अटक झाली असून उर्वरित चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.अशी झालीइतरांची फसवणूकदीपक आणि त्याच्या साथीदारांनी केवळ फसवणुकीसाठी पाच फोन वापरले. त्याद्वारे ते फक्त गिºहाईकांना जाळ्यात ओढत होते. त्याद्वारे त्यांनी सुमारे १०५ जणांना गंडा घातल्याचे उघड झाले.यात आणखीही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोनची फाइल बँकेतून मंजूर करण्यासाठी वाराणसी येथील सचिन सिंग याच्या खात्यावर सुरुवातीला दहा हजार रुपये भरण्यास सांगितले जायचे.त्यानंतर जीएसटीसाठी ३६ हजार, अन त्यानंतरही इतर कारणांनी हे पैसे उकळले जात होते, असे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा