शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
4
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
5
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
6
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
7
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
8
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
9
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
10
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
11
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
12
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
13
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
14
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
15
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
17
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
18
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
19
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
20
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विकी देशमुख टोळीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:03 IST

८० लाख उकळले : बळकावली दगडखाण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेलचा गुंड विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीवर वॉन्टेड असताना गतवर्षी त्याने व्यावसायिकाचे अपहरण करून १० कोटीची खंडणी मागितली होती. तर ५० लाख घेतल्यानंतर त्याची सुटका केल्यानंतर पुन्हा ३० लाख रुपये उकळले होते.

पनवेल परिसरातील दगडखाण व्यावसायिकासोबत डिसेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे. अपहरणाच्या घटनेच्या काही दिवस अगोदरपासून त्यांना विकी देशमुख टोळीकडून खंडणीसाठी धमकी येत होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी १४ डिसेंबरला या व्यापाऱ्याचे पोलीस पाटी लावलेल्या गाडीतून पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले होते. यानंतर त्यांना भिवंडी पाईपलाईन रोडवरून काही अंतरावरील जंगलात नेले होते. त्या ठिकाणी विकी देशमुख याने व्यापाऱ्याकडे १० कोटीची मागणी करत ती पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु तेवढी रक्कम नसल्याचे व्यावसायिकाने सांगितल्यानंतर शेवटी २ कोटी ठरवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी गुजरात रोडवर शिरसाठ फाट्यावर ती रक्कम स्वीकारून त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा ३० लाख रुपये घेऊन नीलेश देशमुखच्या खात्यावर प्रतिमहिना ३५ हजार रुपये घेत होता. त्याशिवाय व्यावसायिकाच्या खाणीचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. मात्र गेल्या महिन्यात देशमुख याला अटक झाल्याचे समजल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार विक्रांत ऊर्फ विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, परशुराम मोकल, उत्तम देशमुख, नीलेश देशमुख, धनेश थोरात, मयूर कोळी व इतर दोघे अशा ९ जणांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

फरार असतानाहीसुरू होते गुन्हेविकी देशमुख व त्याच्या टोळीवर मोक्का लागलेला असून यामध्ये ते पोलिसांना पाहिजे असतानाही तो उघडणे पनवेल परिसरात फिरून खंडणी उकळत होता असे या घटनेवरून समोर येत आहे. तर तक्रारदार व्यापाऱ्याला धमकावताना इतर एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी उचलायचा त्यांचा कट शिजत होता. शिवाय खंडणी नाकारल्यास अशोक घरतला जसे मारले तसे संपवू अशा धमक्याही दिल्या जात होत्या.