शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

विकी देशमुख टोळीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:03 IST

८० लाख उकळले : बळकावली दगडखाण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेलचा गुंड विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीवर वॉन्टेड असताना गतवर्षी त्याने व्यावसायिकाचे अपहरण करून १० कोटीची खंडणी मागितली होती. तर ५० लाख घेतल्यानंतर त्याची सुटका केल्यानंतर पुन्हा ३० लाख रुपये उकळले होते.

पनवेल परिसरातील दगडखाण व्यावसायिकासोबत डिसेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे. अपहरणाच्या घटनेच्या काही दिवस अगोदरपासून त्यांना विकी देशमुख टोळीकडून खंडणीसाठी धमकी येत होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी १४ डिसेंबरला या व्यापाऱ्याचे पोलीस पाटी लावलेल्या गाडीतून पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले होते. यानंतर त्यांना भिवंडी पाईपलाईन रोडवरून काही अंतरावरील जंगलात नेले होते. त्या ठिकाणी विकी देशमुख याने व्यापाऱ्याकडे १० कोटीची मागणी करत ती पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु तेवढी रक्कम नसल्याचे व्यावसायिकाने सांगितल्यानंतर शेवटी २ कोटी ठरवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी गुजरात रोडवर शिरसाठ फाट्यावर ती रक्कम स्वीकारून त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा ३० लाख रुपये घेऊन नीलेश देशमुखच्या खात्यावर प्रतिमहिना ३५ हजार रुपये घेत होता. त्याशिवाय व्यावसायिकाच्या खाणीचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. मात्र गेल्या महिन्यात देशमुख याला अटक झाल्याचे समजल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार विक्रांत ऊर्फ विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, परशुराम मोकल, उत्तम देशमुख, नीलेश देशमुख, धनेश थोरात, मयूर कोळी व इतर दोघे अशा ९ जणांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

फरार असतानाहीसुरू होते गुन्हेविकी देशमुख व त्याच्या टोळीवर मोक्का लागलेला असून यामध्ये ते पोलिसांना पाहिजे असतानाही तो उघडणे पनवेल परिसरात फिरून खंडणी उकळत होता असे या घटनेवरून समोर येत आहे. तर तक्रारदार व्यापाऱ्याला धमकावताना इतर एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी उचलायचा त्यांचा कट शिजत होता. शिवाय खंडणी नाकारल्यास अशोक घरतला जसे मारले तसे संपवू अशा धमक्याही दिल्या जात होत्या.