शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

कल्याण-डोंबिवलीत बलात्कारांचे गुन्हे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:51 IST

सोनसाखळी चोर मातले : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी यामध्ये घट

सचिन सागरे।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांना लक्ष्य केले जात असले, तरी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात यश मिळवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. २०१९ या वर्षात त्यामागील २०१८ या वर्षाच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीचा आलेख उतरल्याने पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ या वर्षात हत्यांचे प्रमाण केवळ तीनने, हत्येच्या प्रयत्नांची संख्या १६ ने, दरोड्यांची संख्या सहाने, जबरी चोरीच्या घटना १२ ने, बलात्कार पाचने वाढले असले, तरी विनयभंग ३३ ने घटले आहेत, असा पोलिसांचा दावा आहे. दरोड्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी दरोड्यांच्या तयारीत असलेल्यांच्या अटकेचे प्रमाण चारने तर, सोनसाखळी चोरीचे प्रमाण २१ ने वाढले आहे. त्यामुळे, हे प्रमाण कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत आठ पोलीस ठाणी आहेत. या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता आदी समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. मात्र, २०१९ या वर्षात पोलिसांना गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील गुन्हेगारी कमी झाली आहे. २०१८ मध्ये २५ हत्या झाल्या होत्या, तर २०१९ मध्ये २२ हत्या झाल्या आहेत. २०१८ मध्ये जबरी चोरीच्या २०१ घटना घडल्या होत्या, ते प्रमाण १२ ने घटून १८९ झाले आहे. इतर जबरी चोरीच्या घटना १४८ वरून ११५ एवढ्या कमी झाल्या आहेत.

विनयभंगाच्या घटना कमी झाल्या असल्या, तरी बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ७४ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१९ मध्ये पाचने वाढ झाली. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये २१ ने वाढ झाली आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झालेली नाही. त्यामुळे ते आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेमध्ये पार पडल्या. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ-३

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंग