शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

"चिल्ला मत, नहीं तो मार डालुंगा", शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ!

By प्रशांत माने | Updated: September 25, 2022 19:12 IST

शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण: शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळयातील सोन्याचे ऐवज आणि पादचा-यांकडील मोबाईल लंपास केल्याने रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनांप्रकरणी महात्मा फुले चौक, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असलेतरी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

पश्चिमेकडील रामदासवाडीतील शालीनी वैद्य या सकाळी ८ वाजता साईबाबा मंदिर समोरील रोडवरून जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वैद्य यांच्या गळ्यातील ७५ हजाराची सोन्याची माळ खेचली. यावेळी वैद्य यांच्या मानेला फास लागून त्यांना घासले गेले. त्यांनी आरडाओरडा करताच त्यांना 'चिल्ला मत नही तो मार डालूंगा' अशी धमकी देत चोरटे ऐवजासह पसार झाले. 

दुसरी घटना भोईरवाडी बसस्टॉपजवळ सकाळी ७ ला घडली. खुशाल चव्हाण हा धावण्याचा सराव करून सुभाषचौक मार्गे बिर्ला कॉलेज बाजुच्या रोडने जात असताना दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी भिडू तेरा मोबाईल दे दे असे ते खुशालला बोलले.  खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता खुशालने विरोध केला. दरम्यान, आणखीन त्याठिकाणी दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी मोबाईल काढून घेत चौघेही पसार झाले. तिस-या घटनेत विकास गोस्वामी सकाळी सहा वाजता एपीएमसी मार्केटच्या गेटसमोरील रोडवरून पायी जात असताना त्यांच्याकडील मोबाईल देखील मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरटयांनी लांबवित पत्रीपूलाच्या दिशेने धूम ठोकली. 

चौथी घटना वसंत व्हॅली याठिकाणी घडली. रचना खटवानी या येथील पपई विक्रेत्याकडे खरेदी करण्यासाठी जात असताना त्यांच्या गळयातील ५० हजार रूपये किमतीची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली तर पाचव्या घटनेत स्नेहल सावंत यांच्या गळ्यातील २५ हजार रूपये किमतीची सोन्याची माळ मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी धुमस्टाईने चोरून नेली. ही घटना बिर्ला कॉलेजरोडवर रात्री पावणेनऊच्या दरम्यान घडली. या पाचही घटना शनिवारी एका दिवसात घडल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी