शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आईची काळजी घ्या! रक्तानं संदेश लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट वाचून सारेच हेलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:23 IST

सततचा त्रास, ब्लॅकमेलिंगला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बांदामध्ये एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिनं गळफास घेतला. तिच्या मृतदेहाजवळ दोन पानांची सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये तरुणाच्या नावाचा उल्लेख आहे. तरुण सातत्यानं ब्लॅकमेल करत असल्यानं विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं.

सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. १९ वर्षांची रोशनी करबई गावची रहिवासी होती. ती बारावीत शिकत होती. रविवारी संध्याकाळी तिनं स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर नायलॉनच्या दोरीनं गळफास लावून घेतला. काही वेळानं तिच्या लहान भावानं खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण दरवाजा बंद होता. त्यानं कसाबसा दरवाजा उघडला. त्यावेळी रोशनी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. 

पोलिसांना रोशनीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. दोन पानांच्या नोटमध्ये गावातील एका तरुणाचा उल्लेख आहे. तरुण ब्लॅकमेल करायचा, त्रास द्यायचा, असं रोशनीनं नोटमध्ये म्हटलं आहे. नोटच्या शेवटी आईची काळजी घ्या असा संदेश तिनं रक्तानं लिहिला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

गावातला एक तरुण रोशनीला कॉलेजमधून येता जाता त्रास द्यायचा, अशी माहिती रोशनीच्या भावानं दिली. रोशनीला तीन बहिणी आहेत. रोशनी सर्वात लहान आहे. रोशनीनं आत्महत्या केली, त्यावेळी तिची आई नातेवाईकांकडे गेली होती. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.