शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रेमाच्या आड आली म्हणून पोटच्या पोरीनं आईचा काटा काढला; सत्य ऐकून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 22:34 IST

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला

आग्रा -  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील व्यापारी अंजली बजाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर महिलेची मुलगी फरार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुलीचा प्रियकर प्रखर गुप्ता याने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली असून, मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट कसा रचला हे त्याने सांगितले आहे.

हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्रखर आणि अंजलीच्या अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार अंजली आणि त्यांच्या पतीलाही कळला. याच कारणावरून पालकांनी मुलीला प्रखरला भेटण्यास मनाई केली होती. अशा स्थितीत मुलीने प्रियकरासह मिळून आईला तिच्या मार्गावरून दूर करण्याचा भयंकर प्लॅन केला.

'मुलीने आई-वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले'प्लॅनिंगचा एक भाग म्हणून प्रखरने गंजदुंडवारा येथील आपल्या ओळखीच्या सहकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून कटाचा भाग बनवला. यानंतर ८ जून रोजी प्रखर, त्याचा मित्र शिलू आणि अंजलीच्या मुलीने प्लॅनिंगनुसार आई आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. जिथे संधी मिळताच प्रखर आणि शीलूने मुलीच्या आईचा खून केला. यानंतर मृतदेह जागीच टाकून ते पळून गेले.

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेतील एक चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकीही जप्त केली आहे.

'आई मला घ्यायला वनखंडी महादेव मंदिरात ये'बुधवारी अंजलीची मुलगी शास्त्रीपुरमहून बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलीचा निरोप आला की आई मला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात ये. दरम्यान मुलीने वडिलांना फोनवर दुसऱ्या ठिकाणी बोलावले. यावर ते पत्नीला मंदिरात सोडून तिथे गेले. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर पती उदित पत्नीला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात पोहोचला मात्र ती तेथे आढळली नाही.

मुलीच्या कटात इकडे तिकडे पळत उदित घरी परतला. तेथे पत्नी न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि रात्री उशिरा काकरैथा येथील ग्रामस्थांनी पोलिसांना महिलेचा मृतदेह जंगलात पडल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले आणि मृतदेह अंजलीचा असल्याचे समजले.