शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या आड आली म्हणून पोटच्या पोरीनं आईचा काटा काढला; सत्य ऐकून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 22:34 IST

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला

आग्रा -  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील व्यापारी अंजली बजाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर महिलेची मुलगी फरार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुलीचा प्रियकर प्रखर गुप्ता याने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली असून, मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट कसा रचला हे त्याने सांगितले आहे.

हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्रखर आणि अंजलीच्या अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार अंजली आणि त्यांच्या पतीलाही कळला. याच कारणावरून पालकांनी मुलीला प्रखरला भेटण्यास मनाई केली होती. अशा स्थितीत मुलीने प्रियकरासह मिळून आईला तिच्या मार्गावरून दूर करण्याचा भयंकर प्लॅन केला.

'मुलीने आई-वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले'प्लॅनिंगचा एक भाग म्हणून प्रखरने गंजदुंडवारा येथील आपल्या ओळखीच्या सहकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून कटाचा भाग बनवला. यानंतर ८ जून रोजी प्रखर, त्याचा मित्र शिलू आणि अंजलीच्या मुलीने प्लॅनिंगनुसार आई आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. जिथे संधी मिळताच प्रखर आणि शीलूने मुलीच्या आईचा खून केला. यानंतर मृतदेह जागीच टाकून ते पळून गेले.

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेतील एक चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकीही जप्त केली आहे.

'आई मला घ्यायला वनखंडी महादेव मंदिरात ये'बुधवारी अंजलीची मुलगी शास्त्रीपुरमहून बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलीचा निरोप आला की आई मला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात ये. दरम्यान मुलीने वडिलांना फोनवर दुसऱ्या ठिकाणी बोलावले. यावर ते पत्नीला मंदिरात सोडून तिथे गेले. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर पती उदित पत्नीला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात पोहोचला मात्र ती तेथे आढळली नाही.

मुलीच्या कटात इकडे तिकडे पळत उदित घरी परतला. तेथे पत्नी न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि रात्री उशिरा काकरैथा येथील ग्रामस्थांनी पोलिसांना महिलेचा मृतदेह जंगलात पडल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले आणि मृतदेह अंजलीचा असल्याचे समजले.