शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

By संदीप प्रधान | Updated: December 18, 2023 08:51 IST

नआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

भिवंडीलगतच्या पडघा बोरीवली या छोट्याशा पाच हजार लोकवस्तीच्या गावात आयसिस टेरर मॉड्युल उभारण्याचा प्रयत्न करीत होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) हाती लागली आहे. साकिब नाचन व त्याच्यासह १५ जणांना एनआयएचे अधिकारी मागील आठवड्याच्या अखेरीस ताब्यात घेऊन गेले. पडघा गावाचे रूपांतर ‘मुक्त क्षेत्र’ करून तेथे देशभरातून जिहादी तरुणांना आणून दहशतवादी प्रशिक्षण देण्याचा हेतू होता. पडघ्याचे रुपांतर हे सिरीयात करण्याची योजना होती, असे स्फोटक खुलासे चौकशीअंती झाले आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहा अतिरेकी हातात एके-४७ घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत फिरत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ अशा सकाळी व सायंकाळी अत्यंत गर्दीच्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात कसाब व त्याच्या साथीदारांनी केला तसा हल्ला केला गेला, तर किती मोठा हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही.

एनआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

महंमद अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत पोलिसांच्या हाती सापडल्याने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत सुदैवाने मोठा अतिरेकी हल्ला झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी आली आहे. पडघ्यात आयसिसकडून शिजत असलेले कटकारस्थान भयंकर आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी प्रशिक्षित करून त्यांना भारतात धाडण्यातील धोका २००८ मध्ये लक्षात आल्याने आता नाचनसारख्या अतिरेकी कारवायांकरिता वेळोवेळी तुरुंगवास भोगलेल्यांना हाताशी धरून भिवंडीजवळच टेरर मॉड्युल उभारण्याचे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा व लष्कराने ठरवले असू शकते.

मुस्लीम समाजातील अशिक्षितता, गरिबी, धर्मांधता यांचा गैरफायदा उठवून थोड्याशा पैशांच्या आमिषाने तरुणांना पडघ्यात आणून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा हेतू एनआयएच्या कारवाईतून स्पष्ट दिसतो. माथी भडकवलेल्या तरुण, तरुणींचा वापर ठाणे जिल्ह्यातील गर्दीच्या शहरांत घातपाती कारवायांकरिता करण्याचा हेतू असू शकतो. पडघ्यातील योजनेला एनआयएने सुरुंग लावला. परंतु देशात मुस्लीमबहुल अन्य गावांत कदाचित अशीच प्रशिक्षण योजना राबवली जात असू शकते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची व नागरिकांची खबरदारी हेच असे हल्ले रोखण्याचा उपाय असू शकतात.देशात जेव्हा दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा सरसकट साऱ्या समाजाला संशयाच्या नजरेने पाहण्याची वृत्तीदेखील वाढली होती. तशी चूक पुन्हा करणे टाळायला हवे. सर्वच जाती, धर्मांत चांगले व वाईट लोक असतात. मोजक्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे देशप्रेमी व्यक्तींकडे सतत संशयाने पाहिले, त्यांना शिक्षण, करिअर, सन्मानाने जगण्याच्या संधी नाकारल्या तर ज्यांना माणसांची मने कलुषित करून घातपात करणारे अधिकाधिक हात हवे आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत करण्यासारखे होते. यातून द्वेषमूलक प्रवृत्तीच बळकट होतात.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादी