शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

By संदीप प्रधान | Updated: December 18, 2023 08:51 IST

नआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

भिवंडीलगतच्या पडघा बोरीवली या छोट्याशा पाच हजार लोकवस्तीच्या गावात आयसिस टेरर मॉड्युल उभारण्याचा प्रयत्न करीत होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) हाती लागली आहे. साकिब नाचन व त्याच्यासह १५ जणांना एनआयएचे अधिकारी मागील आठवड्याच्या अखेरीस ताब्यात घेऊन गेले. पडघा गावाचे रूपांतर ‘मुक्त क्षेत्र’ करून तेथे देशभरातून जिहादी तरुणांना आणून दहशतवादी प्रशिक्षण देण्याचा हेतू होता. पडघ्याचे रुपांतर हे सिरीयात करण्याची योजना होती, असे स्फोटक खुलासे चौकशीअंती झाले आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहा अतिरेकी हातात एके-४७ घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत फिरत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ अशा सकाळी व सायंकाळी अत्यंत गर्दीच्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात कसाब व त्याच्या साथीदारांनी केला तसा हल्ला केला गेला, तर किती मोठा हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही.

एनआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

महंमद अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत पोलिसांच्या हाती सापडल्याने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत सुदैवाने मोठा अतिरेकी हल्ला झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी आली आहे. पडघ्यात आयसिसकडून शिजत असलेले कटकारस्थान भयंकर आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी प्रशिक्षित करून त्यांना भारतात धाडण्यातील धोका २००८ मध्ये लक्षात आल्याने आता नाचनसारख्या अतिरेकी कारवायांकरिता वेळोवेळी तुरुंगवास भोगलेल्यांना हाताशी धरून भिवंडीजवळच टेरर मॉड्युल उभारण्याचे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा व लष्कराने ठरवले असू शकते.

मुस्लीम समाजातील अशिक्षितता, गरिबी, धर्मांधता यांचा गैरफायदा उठवून थोड्याशा पैशांच्या आमिषाने तरुणांना पडघ्यात आणून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा हेतू एनआयएच्या कारवाईतून स्पष्ट दिसतो. माथी भडकवलेल्या तरुण, तरुणींचा वापर ठाणे जिल्ह्यातील गर्दीच्या शहरांत घातपाती कारवायांकरिता करण्याचा हेतू असू शकतो. पडघ्यातील योजनेला एनआयएने सुरुंग लावला. परंतु देशात मुस्लीमबहुल अन्य गावांत कदाचित अशीच प्रशिक्षण योजना राबवली जात असू शकते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची व नागरिकांची खबरदारी हेच असे हल्ले रोखण्याचा उपाय असू शकतात.देशात जेव्हा दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा सरसकट साऱ्या समाजाला संशयाच्या नजरेने पाहण्याची वृत्तीदेखील वाढली होती. तशी चूक पुन्हा करणे टाळायला हवे. सर्वच जाती, धर्मांत चांगले व वाईट लोक असतात. मोजक्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे देशप्रेमी व्यक्तींकडे सतत संशयाने पाहिले, त्यांना शिक्षण, करिअर, सन्मानाने जगण्याच्या संधी नाकारल्या तर ज्यांना माणसांची मने कलुषित करून घातपात करणारे अधिकाधिक हात हवे आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत करण्यासारखे होते. यातून द्वेषमूलक प्रवृत्तीच बळकट होतात.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादी