शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून, हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:09 IST

किरकोळ भांडण झाल्यावर रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नालासोपारा - रविवारी नातेवाईकांच्या लग्नात गेलेल्या पती- पत्नीचा कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याने रात्री घरी आल्यानंतर किरकोळ भांडण झाल्यावर रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. पतीविरोधात पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर येथील परिसरात नेपाळी चाळीत कमल थापा (२४) आणि अंजू थापा (२०) हे नवीन विवाहित जोडपे राहत होते. या दोघांचे ४० ते ४५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे रविवारी नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यात गेले होते. त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. लग्न सोहळ्यातून घरी परतल्यावर रविवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. रागाच्या भरात कमल याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि घरापासून २०० मीटर अंतरावरील शेतामधील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून मृतदेह त्या ठिकाणी ठेवला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात राहात असलेल्या अंजूचे आई, वडील आणि नातेवाईकांना फोन करून अंजू घरी नसल्याचे सांगून त्यांच्यासोबत शोधाशोध करण्याचा बहाणा केला.वालीव पोलिसांनाही गायब असल्याची माहिती दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचे सुरू केले. तिचा मृतदेह शेतात झाडाला ओढणीच्या सहाय्याने बांधलेला मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पती कमल याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यावर हत्या केल्याचे आरोपी पतीने कबूल केले आहे.पतीचा बनाव झाला उघडसदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयेकर हे करत आहेत.पत्नी गायब झाल्याचा बनाव आरोपीने केला. नातेवाईकां-सोबत शोध घेण्याचा बनाव केला होता. पण संशय आल्याने पतीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर गुन्हा कबूल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार