शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

पत्नीच्या एका मागणीमुळं पती खवळला, चाकू भोसकून केली हत्या; मुलांनाही मारणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 5:33 PM

पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले.

गाजियाबाद – मोदीनगरच्या उमेश पार्क कॉलनीत मंगळवारी एका आरोपीनं गळा कापून दुसऱ्या पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर खोलीला टाळा लावून आरोपीने पळ काढला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराला लागलेलं कुलुप पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडताच धक्कादायक दृश्य समोर पाहायला मिळालं.

पोलिसांनी आतमध्ये एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं. या मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे की, माझी बहीण संपत्तीमधील काही भाग मुलांच्या नावानं करण्यासाठी तिच्या पतीकडे मागणी करत होती. परंतु पती काही ऐकण्यास तयार नव्हता. बहिणीकडून दबाव येत असल्याने त्यानेच माझ्या बहिणीची हत्या केली असावी असा संशय त्याने व्यक्त केला. मृत महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

हापूड गावातील रहिवासी पप्पूने मुलगी पूजा हिचं लग्न १८ वर्षापूर्वी अबूपुर गावातील हरेंद्रसोबत केले होते. काही वर्षांनी हरेंद्रचा मृत्यू झाला. पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले. पूजाचा भाऊ सोनू म्हणाला की, २०१५ मध्ये सुभाषने पूजासोबत कोर्ट मॅरेज केले. सुभाष ८ महिने पूजा आणि दोन मुलांसह मोदीनगर भागात भाड्याने रुम घेऊन राहत होता. अलीकडेच ते उमेश पार्क कॉलनीत शिफ्ट झाले.

सुभाषचं आधीच एक लग्न झाल्याचं कळालं तेव्हापासून पुजानं सुभाषला संपत्तीचा काही भाग मुलांच्या नावानं करण्यास सांगितले. पुजा त्यासाठी सुभाषवर दबाव टाकत होती. तेव्हा संधी मिळताच सुभाषनं पुजाचा काटा काढण्याचं ठरवलं. मंगळवारी घरी कुणी नसताना सुभाषनं पुजाची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी पूजाची दोन्ही मुलं शाळेत गेली होती. त्यावेळी सुभाषने पुजाची हत्या करुन घराला टाळा लावून पसार झाला. दिवसभर खोलीत काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच पूजाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचं पाहिलं.

मुलांनाही मारण्याचा डाव  

सोनूने आरोप केलाय की, सुभाष पूजाची हत्या करुन मनिष आणि प्रियंका यांना शाळेतून थेट अबूपुरला गावाला नेले. आईबाबत मुलांनी विचारणा केली असता आई शिमला येथे पिकनिकला गेल्याचं सांगितले ती काही वर्षांनी येईल असं म्हटलं. काही वेळाने अबूपुरहून मुलांना घेऊन तो जंगलातील एका घरात गेला. त्याचवेळी सुभाषला शोधत असणारी पोलीस तिथे पोहचली असता सुभाष मुलांना तिथेच सोडून पळून गेला. सुभाषने मुलांनाही संपवण्याचा डाव रचल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला. सध्या सुभाष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.