शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पत्नीच्या एका मागणीमुळं पती खवळला, चाकू भोसकून केली हत्या; मुलांनाही मारणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:33 IST

पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले.

गाजियाबाद – मोदीनगरच्या उमेश पार्क कॉलनीत मंगळवारी एका आरोपीनं गळा कापून दुसऱ्या पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर खोलीला टाळा लावून आरोपीने पळ काढला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराला लागलेलं कुलुप पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडताच धक्कादायक दृश्य समोर पाहायला मिळालं.

पोलिसांनी आतमध्ये एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं. या मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे की, माझी बहीण संपत्तीमधील काही भाग मुलांच्या नावानं करण्यासाठी तिच्या पतीकडे मागणी करत होती. परंतु पती काही ऐकण्यास तयार नव्हता. बहिणीकडून दबाव येत असल्याने त्यानेच माझ्या बहिणीची हत्या केली असावी असा संशय त्याने व्यक्त केला. मृत महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

हापूड गावातील रहिवासी पप्पूने मुलगी पूजा हिचं लग्न १८ वर्षापूर्वी अबूपुर गावातील हरेंद्रसोबत केले होते. काही वर्षांनी हरेंद्रचा मृत्यू झाला. पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले. पूजाचा भाऊ सोनू म्हणाला की, २०१५ मध्ये सुभाषने पूजासोबत कोर्ट मॅरेज केले. सुभाष ८ महिने पूजा आणि दोन मुलांसह मोदीनगर भागात भाड्याने रुम घेऊन राहत होता. अलीकडेच ते उमेश पार्क कॉलनीत शिफ्ट झाले.

सुभाषचं आधीच एक लग्न झाल्याचं कळालं तेव्हापासून पुजानं सुभाषला संपत्तीचा काही भाग मुलांच्या नावानं करण्यास सांगितले. पुजा त्यासाठी सुभाषवर दबाव टाकत होती. तेव्हा संधी मिळताच सुभाषनं पुजाचा काटा काढण्याचं ठरवलं. मंगळवारी घरी कुणी नसताना सुभाषनं पुजाची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी पूजाची दोन्ही मुलं शाळेत गेली होती. त्यावेळी सुभाषने पुजाची हत्या करुन घराला टाळा लावून पसार झाला. दिवसभर खोलीत काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच पूजाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचं पाहिलं.

मुलांनाही मारण्याचा डाव  

सोनूने आरोप केलाय की, सुभाष पूजाची हत्या करुन मनिष आणि प्रियंका यांना शाळेतून थेट अबूपुरला गावाला नेले. आईबाबत मुलांनी विचारणा केली असता आई शिमला येथे पिकनिकला गेल्याचं सांगितले ती काही वर्षांनी येईल असं म्हटलं. काही वेळाने अबूपुरहून मुलांना घेऊन तो जंगलातील एका घरात गेला. त्याचवेळी सुभाषला शोधत असणारी पोलीस तिथे पोहचली असता सुभाष मुलांना तिथेच सोडून पळून गेला. सुभाषने मुलांनाही संपवण्याचा डाव रचल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला. सध्या सुभाष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.