शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या एका मागणीमुळं पती खवळला, चाकू भोसकून केली हत्या; मुलांनाही मारणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:33 IST

पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले.

गाजियाबाद – मोदीनगरच्या उमेश पार्क कॉलनीत मंगळवारी एका आरोपीनं गळा कापून दुसऱ्या पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर खोलीला टाळा लावून आरोपीने पळ काढला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराला लागलेलं कुलुप पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडताच धक्कादायक दृश्य समोर पाहायला मिळालं.

पोलिसांनी आतमध्ये एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं. या मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे की, माझी बहीण संपत्तीमधील काही भाग मुलांच्या नावानं करण्यासाठी तिच्या पतीकडे मागणी करत होती. परंतु पती काही ऐकण्यास तयार नव्हता. बहिणीकडून दबाव येत असल्याने त्यानेच माझ्या बहिणीची हत्या केली असावी असा संशय त्याने व्यक्त केला. मृत महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

हापूड गावातील रहिवासी पप्पूने मुलगी पूजा हिचं लग्न १८ वर्षापूर्वी अबूपुर गावातील हरेंद्रसोबत केले होते. काही वर्षांनी हरेंद्रचा मृत्यू झाला. पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले. पूजाचा भाऊ सोनू म्हणाला की, २०१५ मध्ये सुभाषने पूजासोबत कोर्ट मॅरेज केले. सुभाष ८ महिने पूजा आणि दोन मुलांसह मोदीनगर भागात भाड्याने रुम घेऊन राहत होता. अलीकडेच ते उमेश पार्क कॉलनीत शिफ्ट झाले.

सुभाषचं आधीच एक लग्न झाल्याचं कळालं तेव्हापासून पुजानं सुभाषला संपत्तीचा काही भाग मुलांच्या नावानं करण्यास सांगितले. पुजा त्यासाठी सुभाषवर दबाव टाकत होती. तेव्हा संधी मिळताच सुभाषनं पुजाचा काटा काढण्याचं ठरवलं. मंगळवारी घरी कुणी नसताना सुभाषनं पुजाची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी पूजाची दोन्ही मुलं शाळेत गेली होती. त्यावेळी सुभाषने पुजाची हत्या करुन घराला टाळा लावून पसार झाला. दिवसभर खोलीत काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच पूजाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचं पाहिलं.

मुलांनाही मारण्याचा डाव  

सोनूने आरोप केलाय की, सुभाष पूजाची हत्या करुन मनिष आणि प्रियंका यांना शाळेतून थेट अबूपुरला गावाला नेले. आईबाबत मुलांनी विचारणा केली असता आई शिमला येथे पिकनिकला गेल्याचं सांगितले ती काही वर्षांनी येईल असं म्हटलं. काही वेळाने अबूपुरहून मुलांना घेऊन तो जंगलातील एका घरात गेला. त्याचवेळी सुभाषला शोधत असणारी पोलीस तिथे पोहचली असता सुभाष मुलांना तिथेच सोडून पळून गेला. सुभाषने मुलांनाही संपवण्याचा डाव रचल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला. सध्या सुभाष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.