शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By दीप्ती देशमुख | Updated: November 9, 2022 19:55 IST

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी

Sanjay Raut | लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेचे आदेश देणाऱ्या विशेष PMLA न्यायालयाच्या आदेशावर त्वरीत स्थगिती देण्याची EDची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ईडीच्या अपिलावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. विशेष पीएमएलए पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या  आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला त्वरीत स्थगिती देण्यास नकार दिला.

‘मी विशेष न्यायालयाचा आदेशही वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. तसेच कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, ते ही माहीत नाही. प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी स्थगितीचा आदेश कसा देऊ?’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.

‘केंद्रीय तपास यंत्रणेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेऊ. सुनावणी घेतल्यानंतर जर जामीन रद्द केला तर आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते,’ असे न्यायालयाने म्हटले. कायद्याच्या कोणत्या तरतुदीअंतर्गत मी जामिनाच्या आदेशावर स्थगिती देऊ शकते? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. गुरुवारपर्यंत विशेष न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती द्यावी, अशी मागणी अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, एका दिवसातच या अर्जावर सुनावणी पूर्ण होईल, याची खात्री नाही.

विशेष न्यायालयाने एक महिना जामीन अर्जावर सुनावणी घेतली आणि मग निकाल दिला. मी आत्ताच त्यावर निर्णय घेऊ, अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमच्याबरोबर (ईडी) किंवा त्यांच्याबरोबर (संजय राऊत आणि प्रवीण राऊत) कोणताही अन्याय होऊ नये. जेव्हा तुम्ही जामीन रद्द करण्यासाठी येता, तेव्हा न्यायालयाला मर्यादित अधिकार असतात,’ असे न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने म्हटले.

ईडीच्या अर्जावर प्रवीण राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी आक्षेप घेतला. आरोपी जर जामिनावर बाहेर आले तर ते फरार होणार नाहीत. एक आरोपी राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची या समाजातच मुळे रूतलेली आहेत. जामिनावर सुटका करताना  विशेष न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. कोणीही पळून जाणार नाही, असे पौडा यांनी म्हटले. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर १०२ दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय