शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By दीप्ती देशमुख | Updated: November 9, 2022 19:55 IST

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी

Sanjay Raut | लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेचे आदेश देणाऱ्या विशेष PMLA न्यायालयाच्या आदेशावर त्वरीत स्थगिती देण्याची EDची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ईडीच्या अपिलावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. विशेष पीएमएलए पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या  आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला त्वरीत स्थगिती देण्यास नकार दिला.

‘मी विशेष न्यायालयाचा आदेशही वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. तसेच कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, ते ही माहीत नाही. प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी स्थगितीचा आदेश कसा देऊ?’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.

‘केंद्रीय तपास यंत्रणेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेऊ. सुनावणी घेतल्यानंतर जर जामीन रद्द केला तर आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते,’ असे न्यायालयाने म्हटले. कायद्याच्या कोणत्या तरतुदीअंतर्गत मी जामिनाच्या आदेशावर स्थगिती देऊ शकते? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. गुरुवारपर्यंत विशेष न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती द्यावी, अशी मागणी अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, एका दिवसातच या अर्जावर सुनावणी पूर्ण होईल, याची खात्री नाही.

विशेष न्यायालयाने एक महिना जामीन अर्जावर सुनावणी घेतली आणि मग निकाल दिला. मी आत्ताच त्यावर निर्णय घेऊ, अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमच्याबरोबर (ईडी) किंवा त्यांच्याबरोबर (संजय राऊत आणि प्रवीण राऊत) कोणताही अन्याय होऊ नये. जेव्हा तुम्ही जामीन रद्द करण्यासाठी येता, तेव्हा न्यायालयाला मर्यादित अधिकार असतात,’ असे न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने म्हटले.

ईडीच्या अर्जावर प्रवीण राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी आक्षेप घेतला. आरोपी जर जामिनावर बाहेर आले तर ते फरार होणार नाहीत. एक आरोपी राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची या समाजातच मुळे रूतलेली आहेत. जामिनावर सुटका करताना  विशेष न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. कोणीही पळून जाणार नाही, असे पौडा यांनी म्हटले. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर १०२ दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय