शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पतीशी भांडणानंतर ‘तिची’ रेल्वेमध्येच आत्महत्या; घटनेनंतर मुलाला घेऊन पती पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 08:00 IST

वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बांद्रा (मुंबई) वरून बिहारकडे निघालेल्या वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्यासोबत असलेल्या तिच्या पतीने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलीस शोध घेत आहेत.

वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून मृत महिला आरती, तिचा पती मिथिलेश आणि त्यांचा छोटा मुलगा हे बिहारमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. आरक्षित डब्यातून शौचालयाच्या कडेला विनातिकीट प्रवास करणाऱ्या या पती-पत्नीमध्ये काही कारणांनी शाब्दिक खटका उडाल्याचे प्रवाशांनी सांगितले. बोगीतील शौचालयाला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये याबाबत कुजबुज सुरू झाली. काही प्रवाशांनी डब्यातील तिकीट तपासनिसाला याची माहिती दिली.

नातेवाइकांना बोलाविलेयाबाबत पतीचा मुलासोबत बोरीवली प्लॅटफॉर्मवरून चालत असलेला फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. मृत्यू अहवाल येण्याआधीच पालघर आरपीएफच्या काही कर्मचाऱ्यांनी माहिती अन्य लोकांना दिल्याने या तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपण आरपीएफचे अधिकारी राय यांच्याकडे आक्षेप नोंदविल्याचे लोहमार्ग पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. महिलेच्या नातेवाइकांना बिहार येथून बोलाविण्यात आले आहे.