शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेटा नको रे मारू, मी आई आहे तुझी! आई आक्रोश करत होती; मुलानं चाकूनं भोसकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:02 IST

भररस्त्यात चाकूनं सपासप वार करत तरुणाकडून आईची निर्घृण हत्या

गुरुग्राम: कौटुंबिक वाद आणि बेरोजगारीला कंटाळून एका तरुणानं चाकूनं भोसकून आईची हत्या केली आहे. आई नेहमीप्रमाणे इंजिनीयर मुलाला त्याच्या घरी जेवण द्यायला गेली होती. त्यानंतर दोघे रस्त्यात बागेजवळ उभे राहून बोलत होते. त्यादरम्यान तरुणानं आईवर चाकूनं वार केले. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

जखमी अवस्थेत ६६ वर्षीय महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी रात्री शिवपुरी वसाहतीत ही घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलगा उपाशी राहू नये म्हणून आई त्याला दररोज जेवण घेऊन जायची. त्याच आईला मुलानं चाकूनं वार करून संपवलं. मुलगा हल्ला करत असताना आई गयावया करत होती. मला कशाला मारतो आहेस, मला मारू नको, मी तुझी आहे, अशा शब्दांत आईनं गयावया केली. पण मुलाच्या पाषाणरुपी मनाला पाझर फुटला नाही.

मुलगा मनिष भंडारी बीटेक केल्यानंतर एका प्रख्यात कंपनीत काम करत होता, असं रणवीर कुमार भंडारी यांनी सांगितलं. रणवीर भंडारी २०१३ मध्ये रेल्वेतून निवृत्त झाले. मनीष आणि त्याची पत्नी श्वेता कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले. त्यानंतर श्वेता मुलासोबत सेक्टर १८ मधील इमारतीत राहायची. लॉकडाऊनमध्ये मनिषची नोकरी गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये मनिष आई वडिलांपासून राहू लागले. त्याचं घर आई वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे.

मनिषची आई वीणा त्याच्यासाठी रोज जेवण घेऊन जायची. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास वीणा मनिषसाठी जेवण घेऊन गेल्या होत्या. बराच वेळ त्या घरी न परतल्यानं पती त्यांना शोधण्यासाठी निघाले. तेव्हा शिव वाटिकेजवळ वीणा आणि मनिष बोलताना त्यांना दिसले. आम्ही बोलतोय, तुम्ही घरी जा, असं वीणा यांनी पतीला सांगितलं. त्यानंतर रणवीर घरी परतले. थोड्याच वेळात रस्त्यावर आरडाओरड झाली. रणवीर बागेजवळ पोहोचले. त्यावेळी वीणा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आसपासच्या लोकांच्या मदतीनं रणवीर यांनी वीणा यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.