शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Crime News: नायगावची एक मुलगी आत्महत्या करतेय; मुंबई पोलिसांना फोन गेला आणि पटापट सूत्रे हलली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 08:42 IST

दादरच्या नायगाव येथे राहणारी एक मुलगी आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे सांगत घरातून एकटीच निघून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘लोकमत’च्या महिला पत्रकाराची सतर्कता व वरळी सायबर पोलिसांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे १५ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले. तिच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने दादर परिसरातून तिला पोलिसांनी ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले आहे.

वरळी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एक फोन आला जो ‘लोकमत’च्या क्राईम रिपोर्टर मनीषा म्हात्रे यांचा होता. दादरच्या नायगाव येथे राहणारी एक मुलगी आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे सांगत घरातून एकटीच निघून गेली. त्यामुळे  तिला वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती म्हात्रे यांनी केली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रात्रपाळीवर असलेले पोलीस शिपाई बाबरे यांना मी याबाबत माहिती दिली व तत्काळ मुलीची तांत्रिक माहितीद्वारे तिचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. 

तेव्हा बाबरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सुयोग अमृतकर यांची मदत घेऊन, तांत्रिक पद्धतीने तिचा शोध घेतला. तेव्हा ती दादर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी बाबरे यांनी मुलीच्या वडिलांसह दादर परिसरातील रानडे रोड येथून तिला शोधून काढले.  प्रथम तिला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली. त्यानंतर मुलीला तिची चूक लक्षात आल्यावर, तिच्या पालकांच्या ताब्यात साधारण पावणे अकराच्या सुमारास दिले.

दीड तास सुरू असलेल्या या सर्व शोधमोहिमेंतर्गत शिंदे हे मुलीचे वडील आणि म्हात्रे, तसेच पोलीस स्टाफच्या संपर्कात होते. मुलीच्या वडिलांनी यासाठी पोलीस तसेच म्हात्रे यांचे आभार मानले. तर ‘मुलीचा जीव वाचविणाऱ्या मुंबई पोलिसांना सलाम’, या भाषेत म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पथकाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस