शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भिवंडीतून पाच वर्षांपूर्वी अपहृत झालेली मुलगी मिळाली ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 21:28 IST

मर्जीनेच लग्न केल्याचा दावा : गुजरातमधून आली होती नातलगांना भेटायला

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला सोमवारी दुपारी यश आले. मर्जीनेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह केल्याचाही दावा तिने चौकशीमध्ये पोलिसांकडे केला.

भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन १७ वर्षांच्या या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ९ मार्च २०२१ रोजी म्हणजे पाच वर्षांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते. हाच तपास १८ जून २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाला. दरम्यान, हीच मुलगी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे काही कामानिमित्त येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक भगवान औटी यांना मिळाली. त्या आधारे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका लहान बाळासह मासुंदा तलाव परिसरात ती उभी असताना या पथकाने तिला ताब्यात घेतले. तेव्हा गुजरात येथून ठाण्यातील नातेवाइकांना भेटायला आल्याचे तिने सांगितले.

सध्या ती २२ वर्षांची असून, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुजरात येथील एका तरुणाबरोबर मर्जीने विवाह केला. तिला सध्या तीन वर्षांचा मुलगाही असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करून तिला तिच्या पतीच्या ताब्यात दिल्याचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी