शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या मुलीचा बसमध्ये मृत्यू; विचित्र घटनेमुळे पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:08 IST

तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले

नवी मुंबई - गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा बसमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. ही तरुणी मालाडची असून रविवारी ती गोव्याहून मुंबईला बसने प्रवास करत होती. तमिना आलीम असं या तरूणीचं नाव असून अलीकडेच तिचा गोव्यामध्ये बाईक अपघात झाला होता. बसमध्ये तमिनाचा श्वास थांबल्यानं तिच्या मित्राने बस थांबवायला सांगितली. मात्र त्यावरून चालक वाहकानं मारहाण केल्यानं हे प्रकरण रहस्यमय बनलं. 

नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी वाहनचालक आणि एकाला ताब्यात घेतले आहे. २२ वर्षीय तरुणी मालाडच्या मालवणी भागात राहत होती. तमिना गोव्यातील बागा बीचजवळील बारमध्ये काम करायची. शुक्रवारी ती दुचाकीवरून अपघात झाल्याने जखमी झाली होती. तेव्हा आईने तिला मुंबईला यायला सांगितले. तमिनाच्या आईनं म्हटलं की, माझी मुलगी दहावीपर्यंत मालवणीत शिकली. ६-७ महिन्यापूर्वी ती गोव्याला शिफ्ट झाली होती. शुक्रवारी तिने मला फोन करून तिचा अपघात झाल्याचं कळवलं. तेव्हा मी तिला घरी येण्यास सांगितले. तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले असं तिने सांगितले. 

तर तमिना काही खात नव्हती, तिच्या पोटात दुखत असल्याचं म्हणत होती. रविवारी सकाळी ८.५० च्या सुमारास सातारा येथील एका हॉटेलवर ट्रॅव्हल्स थांबली. तेव्हा सचिन चहा घेण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर जेव्हा तो बसमध्ये परत आला तेव्हा बस क्लिनर योगेश तमिनाला सीपीआर देताना दिसला. तिला श्वास घेता येत नव्हता. मी योगेशला तातडीने जवळच्या हॉस्पिटलला गाडी नेण्याची विनंती केली तेव्हा त्याने मला ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने ढकललं आणि तिथे बसण्यास भाग पाडले. त्यांनी माझ्यावरच आरोप करत आता पोलीस स्टेशनला जाऊ असं म्हटलं. त्यानंतर गाडी पुढे चालली नेरुळ इथे पोहचल्यावर एका पोलीस चौकीजवळ थांबलो तेव्हा तमिना आणि मला एनएमएमसी रुग्णालयात नेले. तिथे तमिनाला मृत घोषित करण्यात आले असं तमिनासोबत प्रवास करणारा मित्र सचिनने सांगितले. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तमिनाच्या मृत्यूची अपघाती नोंद घेतली आहे. परंतु तिच्या मित्राने जे काही सांगितले आणि बसमधील इतर कुणीही यावर आक्षेप घेतला नाही हे विचित्र आहे. सध्या आम्ही या प्रकरणी सर्व अँगलने तपास करत आहोत. जर दुचाकी अपघातात मुलीला दुखापत झाली असेल तर तिला गोव्यातील कोणत्या डॉक्टरकडे नेले आणि तिथे काय उपचार केले गेले याची माहिती घेतली जात आहे. सोमवारी आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचं आव्हान नेरुळ पोलिसांसमोर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"