शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या मुलीचा बसमध्ये मृत्यू; विचित्र घटनेमुळे पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:08 IST

तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले

नवी मुंबई - गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा बसमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. ही तरुणी मालाडची असून रविवारी ती गोव्याहून मुंबईला बसने प्रवास करत होती. तमिना आलीम असं या तरूणीचं नाव असून अलीकडेच तिचा गोव्यामध्ये बाईक अपघात झाला होता. बसमध्ये तमिनाचा श्वास थांबल्यानं तिच्या मित्राने बस थांबवायला सांगितली. मात्र त्यावरून चालक वाहकानं मारहाण केल्यानं हे प्रकरण रहस्यमय बनलं. 

नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी वाहनचालक आणि एकाला ताब्यात घेतले आहे. २२ वर्षीय तरुणी मालाडच्या मालवणी भागात राहत होती. तमिना गोव्यातील बागा बीचजवळील बारमध्ये काम करायची. शुक्रवारी ती दुचाकीवरून अपघात झाल्याने जखमी झाली होती. तेव्हा आईने तिला मुंबईला यायला सांगितले. तमिनाच्या आईनं म्हटलं की, माझी मुलगी दहावीपर्यंत मालवणीत शिकली. ६-७ महिन्यापूर्वी ती गोव्याला शिफ्ट झाली होती. शुक्रवारी तिने मला फोन करून तिचा अपघात झाल्याचं कळवलं. तेव्हा मी तिला घरी येण्यास सांगितले. तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले असं तिने सांगितले. 

तर तमिना काही खात नव्हती, तिच्या पोटात दुखत असल्याचं म्हणत होती. रविवारी सकाळी ८.५० च्या सुमारास सातारा येथील एका हॉटेलवर ट्रॅव्हल्स थांबली. तेव्हा सचिन चहा घेण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर जेव्हा तो बसमध्ये परत आला तेव्हा बस क्लिनर योगेश तमिनाला सीपीआर देताना दिसला. तिला श्वास घेता येत नव्हता. मी योगेशला तातडीने जवळच्या हॉस्पिटलला गाडी नेण्याची विनंती केली तेव्हा त्याने मला ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने ढकललं आणि तिथे बसण्यास भाग पाडले. त्यांनी माझ्यावरच आरोप करत आता पोलीस स्टेशनला जाऊ असं म्हटलं. त्यानंतर गाडी पुढे चालली नेरुळ इथे पोहचल्यावर एका पोलीस चौकीजवळ थांबलो तेव्हा तमिना आणि मला एनएमएमसी रुग्णालयात नेले. तिथे तमिनाला मृत घोषित करण्यात आले असं तमिनासोबत प्रवास करणारा मित्र सचिनने सांगितले. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तमिनाच्या मृत्यूची अपघाती नोंद घेतली आहे. परंतु तिच्या मित्राने जे काही सांगितले आणि बसमधील इतर कुणीही यावर आक्षेप घेतला नाही हे विचित्र आहे. सध्या आम्ही या प्रकरणी सर्व अँगलने तपास करत आहोत. जर दुचाकी अपघातात मुलीला दुखापत झाली असेल तर तिला गोव्यातील कोणत्या डॉक्टरकडे नेले आणि तिथे काय उपचार केले गेले याची माहिती घेतली जात आहे. सोमवारी आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचं आव्हान नेरुळ पोलिसांसमोर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"