शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

प्रेमाचा दुर्दैवी अंत! वाढदिवसाच्या दिवशीच पतीनं पत्नीला दिली थरकाप उडवणारी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 12:01 IST

पोलिसांनी हॉटेल रजिस्टर चेक केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रियंकाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

गाजियाबादच्या एका हॉटेलमध्ये सोमवारी पतीने पत्नीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलं आणि त्यानंतर तिला भयानक गिफ्ट दिलं ज्याचा कुणीही विचार केला नाही. अडीच वर्षात प्रेम, लग्न आणि हत्या असा दु:खद प्रवास ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. सुरुवातीला अर्जुन आणि प्रियंकाने घरच्यांच्या मर्जीविरोधात कोर्टात जाऊन लग्न करण्याची धमकी दिली. परंतु त्यानंतर घरच्यांनीच दोघांचे लग्न लावून दिले. प्रेमाच्या या नात्यात हुंड्याची गोष्ट कधी आडकाठी येईल असं वाटलं नाही.

मृत प्रियंकाचा भाऊ चंचलने आरोप केलाय की, अर्जुन वारंवार हुंड्याची मागणी करत होता. त्यासाठी त्याने प्रियंकाला मारहाण करत करंटही दिला होता. हे प्रियंकाच्या कुटुंबाला कळताच ते प्रियंकाच्या सासरी पोहचले तेव्हा आरोपी त्यांना बघून पळाला. इतकचं नाही तर आरोपी पतीने अनेकदा प्रियंकाच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी लग्नानंतर एका पेट्रोल पंपावर काम करत होता. काही महिन्यांनी ते काम सोडले. प्रियंकाला होणारी मारहाण आणि अन्य प्रकरणात आरोपीविरोधात बुऱ्हाडी पोलीस ठाण्यात तक्रारी आहेत.

हॉटेलमध्ये नव्हते सीसीटीव्ही, कुणीही ऐकला नाही आवाज

नातेवाईकांनी हॉटेलच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. हॉटेलमध्ये कुठेही सीसीटीव्ही नाहीत. घटनेच्या काही वेळेपूर्वी अर्जुन आणि प्रियंका यांच्या वादविवाद झाला. मग हॉटेल कर्मचाऱ्यांपैकी कुणीही आवाज ऐकला नाही. पोलिसांनी हॉटेल रजिस्टर चेक केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रियंकाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

अर्जुन आणि प्रियंका दोघंही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. अडीच वर्षापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेजबाबत घरात सांगितले. तपासणी केली असता कुठलेही कागदपत्रे सापडले नाहीत. पण दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी संवाद साधत लग्न लावून दिले. लग्नाच्या सहा महिन्यांनतर अर्जुन आणि प्रियंका यांच्यात हुंड्याच्या पैशावरुन वादविवाद सुरु झाले. हे वाद कायम सुरुच होते. प्रियंका आणि अर्जुनची दीड वर्षाची मुलगी नित्या हिच्यावर वादाचा परिणाम होऊ लागला. आता प्रियंकाच्या मृत्यूनंतर मुलगी नित्या कुणाकडेही जात नसून या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.