शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उल्हासनगरात टोळक्यांची दहशद; १० गाड्यांची तोडफोड, ५ जणांना अटक, परिसरात भीतीचे वातावरण

By सदानंद नाईक | Updated: July 23, 2022 17:36 IST

Ulhasnagar : शुक्रवारी मध्यरात्री काही जणांच्या टोळक्याने हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालून रिक्षा, मोटरसायकल आदी १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली.

उल्हासनगर : कॅम्प नं-२ हनुमाननगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका टोळक्याने धिंगाणा घालत १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन असल्याने, त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 उल्हासनगर कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, डम्पिंग परिसर व टेकडी परिसरात लहान-मोठया टोळ्या कार्यरत झाल्या असून त्यांच्यातील हाणामारी नेहमीची झाली. अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मध्यरात्री काही जणांच्या टोळक्याने हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालून रिक्षा, मोटरसायकल आदी १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मध्यरात्री झालेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे ५ जणांना अटक केली. त्यापैकी ३ जण अल्पवयीन असल्याने, त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली. तर इतरांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. 

कॅम्प नं-२ परिसरात टोळक्यांकडून हाणामारी व वाहनांची तोडफोड वारंवार होत असल्याने, नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाबी कॉलनी सुभाषनगर परिसरात अश्याच प्रकारे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली होती. शहरात पोलिसांचा धाक न राहिल्याने, अश्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बार मध्ये छमछम वाढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच जुगार, मटका, लॉटरी जुगार, गावठी दारूचे अड्डे शहरात जागोजागी झाल्याने, गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप होत आहे. शहर पोलिसांना गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी मोठी कारवाई करणे अपेक्षित असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर