शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चैनीसाठी चोऱ्या करणारी तरुणांची टोळी जेरबंद, चार गुन्ह्यांची उकल

By उद्धव गोडसे | Updated: May 15, 2023 22:02 IST

चार कृषिपंपांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : चैनी करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने कृषीपंप आणि दुचाकींची चोरी करणारी सहा जणांची टोळी करवीर पोलिसांनी रविवारी (दि. १४) जेरबंद केली. म्हालसवडे (ता. करवीर) येथील या टोळीकडून पोलिसांनी चार कृषीपंप, दोन दुचाकी आणि चोरीसाठी वापरलेली बोलेरो कार असा तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राहुल अर्जुन पाटील (वय ३१), ऋषिकेश लक्ष्मण पाटील (वय २४), विनायक मारुती पाटील (वय ३४), दीपक भिवाजी निकम (वय २३), गणेश पांडुरंग पाटील (वय २५), आणि सम्राट सरदार पाटील (वय २४, सर्व रा. म्हालसवडे, ता. करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांना मंगळवारपर्यंत (दि. १६) पोलिस कोठडी मिळाली.

करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या कृषीपंप चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना म्हालसवडे ते भाटणवाडी रोडवर काही चोरटे कारमधून येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार रविवारी दुपारी सापळा रचून संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत म्हालसवडे, सडोली दुमाला आणि घुंगूरवाडी येथील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.

चैनी करण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. जप्त केलेल्या दुचाकींच्या मालकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, पोलिस अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, प्रशांत पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, फिरोज मुल्ला, अमोल चव्हाण, रणजित देसाई, विजय पाटील आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर