शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक

By दीपक भातुसे | Updated: June 12, 2023 11:53 IST

सोसायटी सभासदांनी घेतले दुबार पीक कर्ज

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींच्या काही सभासदांनी मागील सहा ते सात वर्षात दुबार पीक कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर यासंदर्भात चौकशी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत दिली जाते. सातारा जिल्हा बँकेच्या विकास सोसायट्यांचे सभासद असलेल्या काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या विकास सोसायटी आणि राष्ट्रीयीकृत बँक अशा दोन्हीकडून पीक कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे दिसून आले. कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड सोसायटीत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सहकार उपनिबंधक आणि स्टेट बँकेकडे केली होती. त्यांनी ईडीकडेही याची तक्रार केली आहे.

ईडीने मागविला आयुक्तांकडून अहवाल

ईडीने याप्रकरणी सहकार आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. सहकार आयुक्तांनी ईडीची नोटीस सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली. उपनिबंधकांनी अशी कोणतीही चौकशी केली नसल्याचे आणि गुन्हा दाखल केला नसल्याचे सहकार आयुक्तांना कळवले आहे.

तब्बल दोन हजार शेतकरी दोनदा लाभार्थी?

साताऱ्यातील आठ तालुक्यातील व्याज सवलत घेतलेल्या शेतकऱ्यांची पाच वर्षातील संख्या २ हजारच्या घरात आहे. मात्र दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. वाई येथील सहायक निबंधकांनी एका विकास सोसायटी प्रकरणात दिलेल्या अहवालानुसार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६१३ इतका आहे. या सभासदांनी विकास सोसायटी आणि राष्ट्रीयकृत बँक असे दोन्हीकडून कर्ज घेऊन दोनदा व्याज सवलत योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

जिल्हा बँकेचा संबंध नाही

ज्यांनी दुबार पीक कर्ज घेतले आहे त्यात बँकेचा काहीही संबंध नाही. व्याज परतावा पडताळणी बँक करत नाही. त्याची पडताळणी सहकार विभाग करत असते. मागील सलग १० वर्ष बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बँकेचा नावलौकिक चांगला आहे हे ज्यांना बघवत नाही ते असे उद्योग करत आहेत.  -नितीन पाटील, अध्यक्ष, सातारा जिल्हा सहकारी बँक

टॅग्स :fraudधोकेबाजी