शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक

By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2023 18:51 IST

कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती.

कल्याण- एका तरुणाने प्रेम विराहामुळे प्रेयसीच्या नवीन प्रियकराची हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली होती. भर रस्त्यात घडलेल्या या.घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित उजैनकर याच्यासह त्याचे साथीदार नकुल भोईटे, राहुल चव्हाण आणि सागर गांगुर्डे यांना अटक केली आहे. 

कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. आदित्य बर असे मयत तरुणाचे नाव हाेते. ही हत्या ललित उज्जैनकर व त्याच्या साथीदारांनी केल्याचे तपासात उघड झाले. ललित उज्जैनकर याचे दिवा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. काही कारणास्तव या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तरुणीची गोवंडी येथे राहणाऱ्या आदित्य याच्याशी मैत्री झाली. प्रेम संबंध तुटल्याने ललित उज्जैनकर हा संतापला होता. ललितकडे तरुणीच्या भावाचा कुत्रा सांभाळण्यासाठी दिला होता. 

शनिवारी रात्रीच्या सुमारास तरुणी आणि आदित्य हे दोघे हा कुत्रा घेण्यासाठी खडेगोळवली परिसरात आले. यावेळी ललितचा तरुणी आणि आदित्य सोबत  वाद झाला. या वादातून ललितने आपल्या साथीदारांसह आदित्यवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ललित आपल्या साथीदारांसह पसार झाला होता.. कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ललित उज्जैनकर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. ललितचा एक साथीदार अवघ्या काही तासातच पोलिसांच्या हाती लागला  त्याने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित ललित व त्याचे साथीदार हे मध्य प्रदेश येथे पळून गेले होते. पोलीस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या पथकाने २४ तासाच्या आत चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण