शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2023 21:34 IST

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरुळ येथे घडलेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई या गावात विकासकाची असलेली दहशत मोडीत काढण्याच्या उद्देशाने व त्याने केलेल्या पूर्वीच्या हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार मारेकरुंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलिस आहेत.

विकासक सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरुळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची १० हुन अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना नेरुळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित मोटरसायकल आढळून आली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत चौघांना अटक केली आहे. मेहेक, नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेहेक हा मूळचा गुजरातचा असून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल त्याने ओएलएक्स वरून खरेदी करून दिली होती. त्या मोटारसायकलवरून कौशल व सोनूकुमार याने सवजी यांच्यावर पाळत घेऊन घटनेच्या दिवशी कौशल याने सवजी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर काही अंतरावर मोटरसायकल सोडून वाशीला व तिथून रेल्वेने पनवेलला गेल्यानंतर तिथून त्यांनी बिहार गाठले होते. दरम्यान संशयित मोटरसायकल हाती लागल्यानंतर पोलिसांना तपासाचा धागा मिळाला होता. त्याद्वारे उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे.

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल अनेकांना विकली गेली होती. रातोरात त्या सर्वांची माहिती काढून पथक मेहेक नारिया त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यानुसार १८ तारखेला गुजरात मध्ये धडकल्या पथकाने मेहेक याला ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकरुंची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तात्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून दोन दिवसात त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह आयुक्त संजय मोहिते, उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

मोटरसायकल ठरली सुगावा

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल खरेदी केल्यानंतर तिची नंबरप्लेट अस्पष्ट करण्यात आली होती. शिवाय चेसिस नंबर देखील मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावून मोटरसायकलच्या शेवटच्या खरेदीदाराची माहिती मिळवून तपासाचा धागा पकडला.

२५ लाखाची दिली सुपारी

मयत सवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई या गावी प्रचंड दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचा देखील गुन्हा आहे. मात्र या गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानंतर सवजी यांनी इतरांवर धाक जमवायला सुरवात केली होती. त्यातून गावी त्यांचे अनेकदा वाद देखील झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाईकांसोबत त्यांचा वाद देखील झाला होता. यामुळे सवजी हा आपला सूड घेणार याच्या भीतीने संबंधितांनी त्यांच्या हत्येची २५ लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते.

हत्येचा दोनदा प्रयत्न फसला

मारेकरूनी अहमदाबाद व इतर ठिकाणी दोनदा सवजी यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना पिस्तूल, चाकू देखील पुरवण्यात आले होते. मात्र प्रयत्न यशस्वी न झाल्याने १० मार्चला त्यांनी नवी मुंबईत येऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. अखेर १५ मार्चला नेरूळमध्ये संधी मिळताच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

हत्येनंतर मंदिरात घातला अभिषेक

बुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक घातला होता. हा प्रकार तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना देखील मिळाली. दरम्यान हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार कोण हे मारेकरुंकडून उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई