शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2023 21:34 IST

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरुळ येथे घडलेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई या गावात विकासकाची असलेली दहशत मोडीत काढण्याच्या उद्देशाने व त्याने केलेल्या पूर्वीच्या हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार मारेकरुंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलिस आहेत.

विकासक सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरुळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची १० हुन अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना नेरुळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित मोटरसायकल आढळून आली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत चौघांना अटक केली आहे. मेहेक, नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेहेक हा मूळचा गुजरातचा असून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल त्याने ओएलएक्स वरून खरेदी करून दिली होती. त्या मोटारसायकलवरून कौशल व सोनूकुमार याने सवजी यांच्यावर पाळत घेऊन घटनेच्या दिवशी कौशल याने सवजी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर काही अंतरावर मोटरसायकल सोडून वाशीला व तिथून रेल्वेने पनवेलला गेल्यानंतर तिथून त्यांनी बिहार गाठले होते. दरम्यान संशयित मोटरसायकल हाती लागल्यानंतर पोलिसांना तपासाचा धागा मिळाला होता. त्याद्वारे उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे.

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल अनेकांना विकली गेली होती. रातोरात त्या सर्वांची माहिती काढून पथक मेहेक नारिया त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यानुसार १८ तारखेला गुजरात मध्ये धडकल्या पथकाने मेहेक याला ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकरुंची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तात्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून दोन दिवसात त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह आयुक्त संजय मोहिते, उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

मोटरसायकल ठरली सुगावा

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल खरेदी केल्यानंतर तिची नंबरप्लेट अस्पष्ट करण्यात आली होती. शिवाय चेसिस नंबर देखील मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावून मोटरसायकलच्या शेवटच्या खरेदीदाराची माहिती मिळवून तपासाचा धागा पकडला.

२५ लाखाची दिली सुपारी

मयत सवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई या गावी प्रचंड दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचा देखील गुन्हा आहे. मात्र या गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानंतर सवजी यांनी इतरांवर धाक जमवायला सुरवात केली होती. त्यातून गावी त्यांचे अनेकदा वाद देखील झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाईकांसोबत त्यांचा वाद देखील झाला होता. यामुळे सवजी हा आपला सूड घेणार याच्या भीतीने संबंधितांनी त्यांच्या हत्येची २५ लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते.

हत्येचा दोनदा प्रयत्न फसला

मारेकरूनी अहमदाबाद व इतर ठिकाणी दोनदा सवजी यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना पिस्तूल, चाकू देखील पुरवण्यात आले होते. मात्र प्रयत्न यशस्वी न झाल्याने १० मार्चला त्यांनी नवी मुंबईत येऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. अखेर १५ मार्चला नेरूळमध्ये संधी मिळताच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

हत्येनंतर मंदिरात घातला अभिषेक

बुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक घातला होता. हा प्रकार तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना देखील मिळाली. दरम्यान हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार कोण हे मारेकरुंकडून उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई