शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2023 21:34 IST

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरुळ येथे घडलेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई या गावात विकासकाची असलेली दहशत मोडीत काढण्याच्या उद्देशाने व त्याने केलेल्या पूर्वीच्या हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार मारेकरुंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलिस आहेत.

विकासक सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरुळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची १० हुन अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना नेरुळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित मोटरसायकल आढळून आली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत चौघांना अटक केली आहे. मेहेक, नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेहेक हा मूळचा गुजरातचा असून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल त्याने ओएलएक्स वरून खरेदी करून दिली होती. त्या मोटारसायकलवरून कौशल व सोनूकुमार याने सवजी यांच्यावर पाळत घेऊन घटनेच्या दिवशी कौशल याने सवजी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर काही अंतरावर मोटरसायकल सोडून वाशीला व तिथून रेल्वेने पनवेलला गेल्यानंतर तिथून त्यांनी बिहार गाठले होते. दरम्यान संशयित मोटरसायकल हाती लागल्यानंतर पोलिसांना तपासाचा धागा मिळाला होता. त्याद्वारे उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे.

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल अनेकांना विकली गेली होती. रातोरात त्या सर्वांची माहिती काढून पथक मेहेक नारिया त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यानुसार १८ तारखेला गुजरात मध्ये धडकल्या पथकाने मेहेक याला ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकरुंची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तात्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून दोन दिवसात त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह आयुक्त संजय मोहिते, उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

मोटरसायकल ठरली सुगावा

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल खरेदी केल्यानंतर तिची नंबरप्लेट अस्पष्ट करण्यात आली होती. शिवाय चेसिस नंबर देखील मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावून मोटरसायकलच्या शेवटच्या खरेदीदाराची माहिती मिळवून तपासाचा धागा पकडला.

२५ लाखाची दिली सुपारी

मयत सवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई या गावी प्रचंड दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचा देखील गुन्हा आहे. मात्र या गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानंतर सवजी यांनी इतरांवर धाक जमवायला सुरवात केली होती. त्यातून गावी त्यांचे अनेकदा वाद देखील झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाईकांसोबत त्यांचा वाद देखील झाला होता. यामुळे सवजी हा आपला सूड घेणार याच्या भीतीने संबंधितांनी त्यांच्या हत्येची २५ लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते.

हत्येचा दोनदा प्रयत्न फसला

मारेकरूनी अहमदाबाद व इतर ठिकाणी दोनदा सवजी यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना पिस्तूल, चाकू देखील पुरवण्यात आले होते. मात्र प्रयत्न यशस्वी न झाल्याने १० मार्चला त्यांनी नवी मुंबईत येऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. अखेर १५ मार्चला नेरूळमध्ये संधी मिळताच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

हत्येनंतर मंदिरात घातला अभिषेक

बुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक घातला होता. हा प्रकार तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना देखील मिळाली. दरम्यान हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार कोण हे मारेकरुंकडून उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई