शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

घंटागाडीवरील पाच कामगारांना केली जबर मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:14 IST

कामगारांचे कामबंद आंदोलन : बारावे येथे कचरा टाकण्यास मज्जाव केल्याने झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : घंटागाडीवरील कामगार बारावे गावात बुधवारी रात्री कचरा टाकण्यासाठी गेले असताना तेथील रहिवाशांनी त्यांना कचरा टाकण्यास विरोध केला. तसेच पाच कामगारांना मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ घंटागाडी कामगारांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणचा कचरा उचलण्यात आला नाही.

केडीएमसीने आर ॲण्ड डी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराचे कामगार बुधवारी रात्री घंटागाडी घेऊन बारावे येथे कचरा रिकामा करण्यासाठी गेले असता तेथील रहिवाशांनी त्यांना विरोध केला. मनपा अधिकाऱ्यांनी याच ठिकाणावर कचरा टाकण्यास सांगितल्याचे कामगारांनी त्यांना सांगितले. मात्र, रहिवाशांनी त्यांचे न ऐकता त्यांना मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन केले. त्यात २२० घंटागाडी कामगार सहभागी झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी ‘क’ आणि ‘ब’ प्रभागांतील कचरा उचलला गेला नाही.अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी कामगारांच्या वतीने आवाज उठविला आहे. महापालिका मुख्यालयात धाव घेऊन त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. अशीच परिस्थिती असेल तर कामगारांनी काम कसे करायचे, असा सवाल कामगार संघटनेने केला आहे.

‘स्मशानभूमीच्या जागेवर कचरा टाकू नका’nकामगारांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी सांगितले की, कचरा टाकण्यात आलेली जागा ही ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची जागा आहे. या जागेवर ग्रामस्थांनी संरक्षक भिंत उभारली आहे. nया जागेवर मनपाच्या कचरा कंत्राटदाराचे कामगार कचरा टाकतात. तीन दिवसांपासून त्यांना मज्जाव केला जात आहे. तरीही त्यांच्याकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याने कामगार व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. nग्रामस्थांनीही अतिरिक्त आयुक्त पवार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीच्या जागेवर कचरा न टाकण्याच्या सूचना कंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी केली आहे.