शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

दर तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:26 IST

पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़

ठळक मुद्देसत्र काही थांबेना : कर्जमाफीसह शासनाच्या इतर योजनाही ठरताहेत ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़शाश्वत सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात़ त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त बनते. केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतक-यांची सर्व मदार आहे़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे़शेतकºयाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली़ परंतु त्यानंतरही आत्महत्येचा फेरा सुरुच आहे़ कर्जमाफीसाठीच्या किचकट नियमात शेतकरी अडकले़गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६४५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ तर नवीन वर्षात जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये ३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यात यंदा कपाशीला बोंडअळीचा मोठा फटका बसला़ नगदी पीक असलेल्या कापसाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना तडाखा दिला़ त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले़ जवळपास २२ हजार हेक्टरवरील पिकांचे त्यामुळे नुकसान झाले़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे काही ठिकाणी पिकांना त्याचाही फटका बसला़ अशा लागोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़‘आप’चे उपोषण१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह पवनार जवळील दत्तपूर येथे जावून सामूहिक आत्महत्या केली होती़ ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते़ सोमवारी या घटनेला ३२ वर्षे होत आहेत़ त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे बालाजी आबादार यांनी दिली़