शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दर तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:26 IST

पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़

ठळक मुद्देसत्र काही थांबेना : कर्जमाफीसह शासनाच्या इतर योजनाही ठरताहेत ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़शाश्वत सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात़ त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त बनते. केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतक-यांची सर्व मदार आहे़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे़शेतकºयाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली़ परंतु त्यानंतरही आत्महत्येचा फेरा सुरुच आहे़ कर्जमाफीसाठीच्या किचकट नियमात शेतकरी अडकले़गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६४५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ तर नवीन वर्षात जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये ३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यात यंदा कपाशीला बोंडअळीचा मोठा फटका बसला़ नगदी पीक असलेल्या कापसाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना तडाखा दिला़ त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले़ जवळपास २२ हजार हेक्टरवरील पिकांचे त्यामुळे नुकसान झाले़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे काही ठिकाणी पिकांना त्याचाही फटका बसला़ अशा लागोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़‘आप’चे उपोषण१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह पवनार जवळील दत्तपूर येथे जावून सामूहिक आत्महत्या केली होती़ ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते़ सोमवारी या घटनेला ३२ वर्षे होत आहेत़ त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे बालाजी आबादार यांनी दिली़