शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

दर तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:26 IST

पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़

ठळक मुद्देसत्र काही थांबेना : कर्जमाफीसह शासनाच्या इतर योजनाही ठरताहेत ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़शाश्वत सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात़ त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त बनते. केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतक-यांची सर्व मदार आहे़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे़शेतकºयाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली़ परंतु त्यानंतरही आत्महत्येचा फेरा सुरुच आहे़ कर्जमाफीसाठीच्या किचकट नियमात शेतकरी अडकले़गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६४५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ तर नवीन वर्षात जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये ३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यात यंदा कपाशीला बोंडअळीचा मोठा फटका बसला़ नगदी पीक असलेल्या कापसाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना तडाखा दिला़ त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले़ जवळपास २२ हजार हेक्टरवरील पिकांचे त्यामुळे नुकसान झाले़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे काही ठिकाणी पिकांना त्याचाही फटका बसला़ अशा लागोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़‘आप’चे उपोषण१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह पवनार जवळील दत्तपूर येथे जावून सामूहिक आत्महत्या केली होती़ ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते़ सोमवारी या घटनेला ३२ वर्षे होत आहेत़ त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे बालाजी आबादार यांनी दिली़