शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान आवास योजनेच्या तपासात ईडीची एन्ट्री?; ‘समरथ’ कंपनी ब्लॅकलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 08:42 IST

राज्यात सहा ठिकाणी घेतली कामे, समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले.

औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने ‘समरथ’ कंपनीवर गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. या महाघोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे राज्य शासनामार्फत ताब्यात घेतल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

‘समरथ’ कंपनीने पंतप्रधान आवास योजनेत राज्यात गंगापूर, फुलंब्री, सोयगाव (औरंगाबाद), माजलगाव (बीड), देवगड (सिंधुदुर्ग), राहता (अहमदनगर) येथील कामे घेतली आहेत. काम मिळविण्यासाठी पुण्यातील एक इमारत बांधल्याचा दावा कंपनीने केला. खरोखर कंपनीने इमारत बांधली का? याची शहानिशा मनपा करणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार समरथ कंपनीने एकाच आयपीवरून तीन निविदा आल्याचे समोर आले. चौथी एलोरा कन्स्ट्रक्शन अपात्र ठरविण्यात आली. या प्रकरणात कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. 

प्रकल्प सल्लागार समितीही त्यांचीच योजनेचा सविस्तर डीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागार समितीसुद्धा संबंधित कंपनीचीच होती. अहवाल तयार करताना अक्षम्य चुका करण्यात आल्या. जागा ताब्यात नसताना, जागा बघितलेली नसताना डीपीआर तयार केला. ३९ हजार घरे त्या जागांवर बांधणे शक्यच नाही.

म्हणे पुण्यात बांधली उंच इमारत समरथ कंपनीने काम मिळविण्यासाठी ‘वर्क डन’अंतर्गत मनपाला पुण्यात एक मल्टी स्टोरेज इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मुळात कंपनीने ही इमारत बांधली का? हे तपासण्यासाठी मनपाने समिती स्थापन केली असून लवकरच समिती पुण्यात जाऊन पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.  

एकाच आयपी ॲड्रेसवरून भरल्या निविदा महापालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन ॲण्ड जे. व्ही., इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जॅग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी १०३.२११.६१.१८४ या एकाच आयपी ॲड्रेसवरून कंत्राटासाठी निविदा भरल्या. तीन कंपन्यांनी संगनमत केल्यामुळे समरथ कंपनीला कंत्राट मिळाले.

४६ कोटींपैकी भरले फक्त ८८ लाख  औरंगाबाद शहरात ३९ हजार घरे बांधायची होती. कंपनीने दाखल केलेल्या दरानुसार प्रकल्पाची किंमत ४ हजार ६०० कोटी रुपये होते. प्रकल्पाच्या किमतीच्या तुलनेत १ टक्का बॅँक गॅरंटीप्रमाणे ४६ कोटी भरणे अपेक्षित होते. त्यांनी फक्त ८८ लाख रुपये भरले. त्यामुळे मनपाने ‘समरथ’ कंपनीसोबत ॲग्रीमेंट केले नाही.