शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:39 IST

कारला धक्का लागल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर राणोजी गणकवार यांच्यात हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

औरंगाबाद : कारला धक्का लागल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर राणोजी गणकवार यांच्यात हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता महावीर चौक उड्डाणपुलाखाली पंचवटी चौकात घडली. शेवटी दोन्हीही अधिकारी स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहिल्याने छावणी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले.

छावणी पोलिसांनी सांगितले की, जारवाल हे रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांसह कारने (एमएच-४० एसी ७९२३) कोकणवाडीमार्गे छावणीकडे जात होते. त्याच वेळी गणकवार (रा. हायकोर्ट कॉलनी) हे त्यांच्या कारने (एमएच-१९ एपी ००५६) रेल्वेस्टेशनकडून महावीर चौकाकडे जात होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारमध्ये अपघात झाला. 

अपघातानंतर दोन्ही कारमधून आजी-माजी अधिकारी उतरले आणि ते परस्परांना दोष देऊ लागले. यावेळी प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेले. ते परस्परांना ओळखत नसल्याने जारवाल यांनी थेट छावणी ठाण्यात धाव घेतली. त्यांनी गणकवार यांच्याविरुद्ध कारच्या डिक्कीचे नुकसान केल्याची आणि उद्धटपणे बोलल्याची तक्रार दाखल केली. त्याच वेळी गणकवार हे छावणी ठाण्यात दाखल झाले. त्यांनी त्यांचीही जारवालविरोधात तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनीही जारवाल यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे कार चालवून आपल्या कारला धडक दिल्याची व  शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली. उभयतांच्या तक्रारींवरून छावणी पोलिसांनी परस्परांविरोधी गुन्ह्याची नोंद केली. 

तडजोडीचा प्रयत्न फसलातक्रारदार आजी- माजी पोलीस अधिकारी असल्याने याप्रकरणी गुन्हे न नोंदविता आपसात मिटवून घ्यावे, यासाठी काही जणांनी प्रयत्न केले. मात्र उभय अधिकारी तडजोड करण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शेवटी छावणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.