शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:25 IST

गुन्हे शाखेकडून अटक; पाकिस्तानात फोन करण्यासोबतच आयएसआयची माहिती शोधण्याचा केला होता प्रयत्न

मुंबई : मुंबईत हायअलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’ अशा धमकीच्या कॉलने खळबळ उडाली. मुंबईतही बंदोबस्त वाढला. मात्र, तपासात कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने तरुणाची चौकशी सुरू आहे.शुभमकुमार पाल (२२) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या हेतूबाबत तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने, एनआयएच्या मुख्यालयात कॉल करून ‘बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो’ असे बोलून फोन कट केला. त्याच्या या कॉलमुळे मुंबईत बंदोबस्त वाढविण्यात आला. दहशतवाद विरोधी पथकासह गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. तपासाअंती हे पथक शुभमपर्यंत पोहोचले. त्याला तांत्रिक तपासातून गोरेगावच्या नेस्को, आयटी पार्क येथून अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलद्वारे त्याने एनआयए कार्यालयात कॉल केल्याचे स्पष्ट झाले.

चार वेळा पाकिस्तानमध्ये कॉलच्एनआयएआधी शुभमने चार वेळा पाकिस्तानच्या विविध दूरध्वनी आणि मोबाइल क्रमांकावर कॉल केल्याचे आढळून आले, तसेच पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही त्याच्या मोबाइलमधून समोर आली.च्याबाबत गुन्हे शाखा शुभमची कसून चौकशी करत आहे. मात्र, तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये ये-जाशुभमच्या वडिलांचा गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेली उपकरणे विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त तो जम्मू-काश्मीर, लेह-लडाख या भागात जाऊन आल्याचे चौकशीत समोर आले.दारूच्या नशेत कॉल केल्याचाही अंदाजदिल्लीच्या मेहरोली भागातील गढवाल संकुलात शुभम राहण्यास आहे. घरात सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. त्यानंतर तो येथेच वास्तव्याला होता. दारूच्या नशेत त्याने हा प्रताप केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :terroristदहशतवादी