शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केला मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:25 IST

गुन्हे शाखेकडून अटक; पाकिस्तानात फोन करण्यासोबतच आयएसआयची माहिती शोधण्याचा केला होता प्रयत्न

मुंबई : मुंबईत हायअलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’ अशा धमकीच्या कॉलने खळबळ उडाली. मुंबईतही बंदोबस्त वाढला. मात्र, तपासात कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने तरुणाची चौकशी सुरू आहे.शुभमकुमार पाल (२२) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या हेतूबाबत तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने, एनआयएच्या मुख्यालयात कॉल करून ‘बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो’ असे बोलून फोन कट केला. त्याच्या या कॉलमुळे मुंबईत बंदोबस्त वाढविण्यात आला. दहशतवाद विरोधी पथकासह गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. तपासाअंती हे पथक शुभमपर्यंत पोहोचले. त्याला तांत्रिक तपासातून गोरेगावच्या नेस्को, आयटी पार्क येथून अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलद्वारे त्याने एनआयए कार्यालयात कॉल केल्याचे स्पष्ट झाले.

चार वेळा पाकिस्तानमध्ये कॉलच्एनआयएआधी शुभमने चार वेळा पाकिस्तानच्या विविध दूरध्वनी आणि मोबाइल क्रमांकावर कॉल केल्याचे आढळून आले, तसेच पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही त्याच्या मोबाइलमधून समोर आली.च्याबाबत गुन्हे शाखा शुभमची कसून चौकशी करत आहे. मात्र, तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये ये-जाशुभमच्या वडिलांचा गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेली उपकरणे विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त तो जम्मू-काश्मीर, लेह-लडाख या भागात जाऊन आल्याचे चौकशीत समोर आले.दारूच्या नशेत कॉल केल्याचाही अंदाजदिल्लीच्या मेहरोली भागातील गढवाल संकुलात शुभम राहण्यास आहे. घरात सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. त्यानंतर तो येथेच वास्तव्याला होता. दारूच्या नशेत त्याने हा प्रताप केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :terroristदहशतवादी