शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:50 IST

एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाशी संबंधित एका प्रकरणात खटला किती काळ सुरू राहू शकतो हे समोर आलं आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोषी आता इतका म्हातारा झाला आहे की, त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रासलं आहे. अशा परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने दोषीला दिलासा देत त्याला अवघ्या एक दिवसाची शिक्षा सुनावली.

हा खटला ४० वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या खटल्यावर भाष्य करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं की, हा विलंब जलद सुनावणीच्या घटनात्मक अधिकाराच्या विरोधात आहे आणि यासह न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी आरोपीची शिक्षा कमी करून ती एका दिवसाची केली. हा खटला १९८४ मध्ये सीबीआयने नोंदवला होता. त्यावेळी दोषी व्यक्ती एक सरकारी कर्मचारी होता.

न्यायालयाने म्हटलं की, ही घटना ४ जानेवारी १९८४ रोजी घडली. तेव्हापासून न्यायालयीन कामकाज चार दशकांहून अधिक काळ चाललं. ट्रायल पूर्ण होण्यासाठी जवळजवळ १९ वर्षे लागली. त्यानंतर अपील २२ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित राहिलं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, आरोपीवर टांगती तलवार होती. गेल्या ४० वर्षांपासून त्याचं भविष्य अनिश्चित होतं. 

दंडासह ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 

सुरेंद्र कुमार १९८३ मध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसटीसी) चे वरिष्ठ अधिकारी होते. १९८४ मध्ये एका फर्मच्या भागीदाराकडून १५,००० रुपयांची लाच मागितल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली. २००२ मध्ये त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि १५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 

१५,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

या प्रकरणातील एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, एसटीसीने १४० टन सुक्या माशांच्या पुरवठ्यासाठी कोटेशन मागवलं होतं. मुंबईतील एका फर्मने त्यांचं कोटेशन सादर केलं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. असा आरोप आहे की, एका बैठकीत सुरेंद्र कुमार यांनी खासगी फर्मला आश्वासन दिलं की एसटीसी त्यांच्या फर्मकडून १४० टन सुक्या माशांसाठी ऑर्डर देईल, परंतु त्या बदल्यात १५,००० रुपयांची लाच मागितली. कुमार यांनी तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी ७,५०० रुपये आणण्यास सांगितले, परंतु तक्रारदाराने सीबीआयकडे संपर्क साधला. सीबीआयने कुमार यांच्या घरावर छापा टाकला आणि अटक केली.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालयBribe Caseलाच प्रकरण