शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

स्वत:च्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या कर्जबाजारी व्यक्तीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 07:52 IST

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : पोलीस आयुक्तांनी केले कौतुक

ठाणे : कर्जबाजारी झाल्यामुळे उत्तरप्रदेशातील गंगा नदीत बुडाल्याचा बनाव करणाऱ्या जगदीश प्रसाद मिश्रा (४६, रा. गोरखपूर) याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने भिवंडीतून मोठ्या कौशल्याने शोध घेतला. या पथकाचे मिश्रा कुटुंबीयांनी तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कौतुक केले आहे.

उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे जगदीशप्रसाद हे ९ मार्च २०२१ रोजी उत्तराखंड राज्यात धार्मिक विधीसाठी गेले होते. त्यानंतर ११ मार्च २०२१ रोजी त्यांच्याच मोबाईलवरुन एका अनोळखी व्यक्तीने ते गंगा नदीमध्ये बुडून मृत्यू पावल्याची माहिती त्यांची नातेवाईकांना दिली. त्याआधारे गोरखपूरमधील शाहपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. मात्र, हरिद्वार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमरजित सिंग यांच्या माहितीनुसार जगदीशप्रसाद हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात २० वर्षांपूर्वी वास्तव्याला होते. त्यांचा त्याच परिसरात शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ठाणे पोलिसांकडे केली होती. त्याचा फोटो आणि जुन्या बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नारपोलीतील न्यू ताडाळी गाव येथे राजू चौधरी यांच्या चाळीत १५ मार्च २०२१ पासून जगदीशप्रसाद मिश्रा हे भाड्याने वास्तव्यासाठी असल्याचे समजले. त्यानुसार या पत्त्यावर त्यांचा शोध घेतला असता, जगदीशप्रसाद हे तिथे आढळून आले. कर्जबाजारी झाल्यानेच सुटका होण्याच्या उद्देशाने आपण स्वत: गंगा नदीत बुडाल्याचा घरी खोटा फोन करून मृत्यूचा बनाव केल्याची त्यांनी कबुली दिली. ही माहिती ठाणे पोलिसांनी शाहपूरचे पोलीस उपनिरीक्षक अनुप तिवारी तसेच मिश्रा यांची मुलगी निष्ठा मिश्रा यांनाही देण्यात आली. आपल्या वडिलांचा शोध घेतल्याबद्दल या मुलीने ठाणे पोलिसांचे आभार मानले.