शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्वत:च्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या कर्जबाजारी व्यक्तीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 07:52 IST

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : पोलीस आयुक्तांनी केले कौतुक

ठाणे : कर्जबाजारी झाल्यामुळे उत्तरप्रदेशातील गंगा नदीत बुडाल्याचा बनाव करणाऱ्या जगदीश प्रसाद मिश्रा (४६, रा. गोरखपूर) याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने भिवंडीतून मोठ्या कौशल्याने शोध घेतला. या पथकाचे मिश्रा कुटुंबीयांनी तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कौतुक केले आहे.

उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे जगदीशप्रसाद हे ९ मार्च २०२१ रोजी उत्तराखंड राज्यात धार्मिक विधीसाठी गेले होते. त्यानंतर ११ मार्च २०२१ रोजी त्यांच्याच मोबाईलवरुन एका अनोळखी व्यक्तीने ते गंगा नदीमध्ये बुडून मृत्यू पावल्याची माहिती त्यांची नातेवाईकांना दिली. त्याआधारे गोरखपूरमधील शाहपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. मात्र, हरिद्वार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमरजित सिंग यांच्या माहितीनुसार जगदीशप्रसाद हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात २० वर्षांपूर्वी वास्तव्याला होते. त्यांचा त्याच परिसरात शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ठाणे पोलिसांकडे केली होती. त्याचा फोटो आणि जुन्या बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नारपोलीतील न्यू ताडाळी गाव येथे राजू चौधरी यांच्या चाळीत १५ मार्च २०२१ पासून जगदीशप्रसाद मिश्रा हे भाड्याने वास्तव्यासाठी असल्याचे समजले. त्यानुसार या पत्त्यावर त्यांचा शोध घेतला असता, जगदीशप्रसाद हे तिथे आढळून आले. कर्जबाजारी झाल्यानेच सुटका होण्याच्या उद्देशाने आपण स्वत: गंगा नदीत बुडाल्याचा घरी खोटा फोन करून मृत्यूचा बनाव केल्याची त्यांनी कबुली दिली. ही माहिती ठाणे पोलिसांनी शाहपूरचे पोलीस उपनिरीक्षक अनुप तिवारी तसेच मिश्रा यांची मुलगी निष्ठा मिश्रा यांनाही देण्यात आली. आपल्या वडिलांचा शोध घेतल्याबद्दल या मुलीने ठाणे पोलिसांचे आभार मानले.