शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

काकाच्या पाठीत खंजीर खुपसला, दोघांवर गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: September 25, 2024 20:28 IST

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरोधात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर : क्षुल्लक कारणावरून काकाच्या पाठीत खंजीर खुपसून खून केल्याची घटना लातूर शहरानजीक आर्वी गायरान येथे बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरोधात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आशा सुग्रीव कांबळे (वय ३८, रा. आर्वी गायरान, ता. लातूर) हे आणि बहीण निशा सुरेश कांबळे यांची एकमेकांसमोर घरे आहेत. दरम्यान, मयत सुग्रीव रामहरी कांबळे (वय ४२) हे आपले आधार कार्ड आणि बँकेची कागदपत्रे निशाकडे ठेवले होते, बुधवारी सकाळी ही कागदपत्रे मागण्यासाठी ते निशा कांबळे यांच्या घरासमोर गेले असता यावेळी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.

निशा कांबळे या म्हणाल्या, तुझे कागदपत्रे आमच्याकडे नाहीत म्हणून शिवीगाळ केली. शिवाय, भांडणाची कुरापत काढली. या वादाचे पर्यवसान कडाक्याच्या भांडणात झाले. यावेळी निशा कांबळे यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात काका सुग्रीव कांबळे यांच्या पाठीतच खंजीर खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुग्रीव कांबळे यांचा मृत्यू झाला.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी आशा सुग्रीव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निशा सुरेश कांबळे आणि अल्पवयीन मुलाविरोधात गुर नं. ६३५ / २०२४ कलम १०३ (१), ३५२, ३ (५) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात...आर्वी गायरान (ता. लातूर) येथे खुनाची घटना घडल्यानंतर काही वेळात गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी म्हणून निशा सुरेश कांबळे आणि तिच्या १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पोलिस अधिक कसून चौकशी करत आहेत.

मृतदेहावर रात्री झाले अंत्यसंस्कार...खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचानामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मयत सुग्रीव यांच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

फिर्यादी अन् आरोपी आहेत सख्ख्या बहिणी...मयताची पत्नी आशा कांबळे आणि आरोपी निशा कांबळे या दोघी सख्ख्या बहिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघींची घरे आर्वी गायरान येथे समोरासमोर आहेत. त्यांच्यामध्ये बुधवारी आधार कार्ड आणि बँकेच्या कागदपत्रांवरून जोरदार भांडण झाले आणि निशाच्या मुलाने सुग्रीव यांच्या पाठीत खंजीर खुपसला. गंभीर जखमी झालेल्या सुग्रीवचा यात मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी