शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

बदला घेण्यासाठी झाला गुन्हेगाराचा खून, सहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:42 IST

तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देसूत्रधार फरार, नागपुरातील कांजी हाऊस हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.खुनाच्या घटनेत आर्यन गुप्ता, विजय पडोळे, राहुल बोकडे, महेश ऊर्फ सोनु सोनकुसरे, प्रदीप ऊर्फ बंटी कनपटे आणि एका आरोपीचा समावेश आहे. मंगळवारी रात्री यशोधरानगर ठाण्यांतर्गत कांजी हाऊस चौकात २३ वर्षाच्या समीरचा खून करण्यात आला होता. समीरने दोन अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने २०१७ मध्ये पाचपावलीचा गुन्हेगार पक्याचा खून केला होता. खुनानंतर एका वर्षात त्याची निर्दोष सुटका झाली होती. ‘लोकमत’ने पक्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा खुलासा केला होता. सुटका झाल्याच्या दोन वर्षानंतर खून झाल्यामुळे पोलिसांना बदला घेण्यासाठी खून झाला असे वाटत नव्हते. परंतु पकडलेल्या आरोपींची चौकशी केल्यामुळे या बाबीची पुष्टी झाली. सूत्रांनुसार समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आहे. तीन वर्षापूर्वी समीरने पक्याचा खून केला होता. घटनेच्या वेळी पक्यासोबत सात-आठ साथीदार होते. तरीही समीरने पक्यावर हल्ला करून त्याच्या साथीदारांना पळण्यास भाग पाडले. त्याने फरशीने डोके फोडून पक्याचा खून केला होता. समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार पक्याचे जवळचे मित्र होते. पक्याच्या खुनामुळे ते दु:खी झाले होते. पक्याचा खून झाल्यामुळे समीरचा परिसरात दबदबा निर्माण झाला होता. अंकुश आणि त्याच्या साथीदारांनी पक्याच्या खुनानंतर समीरला धडा दाखविण्याचे ठरविले होते. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर समीर शांत झाल्यामुळे आरोपी आपल्या कामात लागले. काही दिवसांपासून समीर आणि अंकुशमध्ये वाद सुरु झाला. सूत्रांनुसार ६ जानेवारीला सायंकाळी समीरचा विजय जगदाळेशी वाद झाला. समीरने त्याला धमकी दिली. त्यानंतर समीरचा अंकुश सूर्यवंशीसोबत वाद झाला. अंकुशला समीरने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. त्यानंतर अंकुश सूर्यवंशीने साथीदारांना समीरच्या खुनासाठी तयार केले. मंगळवारी सायंकाळी दारू पिल्यानंतर आरोपी समीरचा शोध घेत होते. कांजी हाऊस चौकाजवळ समीर त्यांना भेटला. त्यांनी चौकाजवळ बाईक उभी करून समीरकडे धाव घेतली. समीर जीव वाचविण्यासाठी पळत होता. तो रामचंद्र कुंभारेच्या आर. के. भोजनालयात घुसला.समीरने मागील दाराने भोजनालयात प्रवेश केला. समीरचा समोरच्या दाराने फरार होण्याचा विचार होता. त्याचा पाठलाग करून हल्लेखोर तेथे पोहोचले. भोजनालयाचे समोरचे गेट बंद असल्यामुळे समीरला पळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे तो आरोपींच्या हाती लागला. आरोपींनी जागीच त्याचा खून केला. जीव वाचल्यास समीर बदला घेईल असे आरोपींना वाटल्यामुळे त्यांनी त्याचा खून केला. अंकुश सूर्यवंशी आणि इतर आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे कारण कळू शकते. समीरच्या खुनानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यांच्या मते अवैध धंदे वाढल्यामुळे गुन्हेगार सक्रिय झाले असून पोलीस कमकुवत ठरत आहेत.धाक निर्माण करण्यासाठी कसरतपक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासोबतच आपला धाक निर्माण करण्यासाठी समीरचा खून केल्याची माहिती आहे. महेश सोनकुसरेने तीन वर्षापूर्वी पाचपावलीत एका गुन्हेगाराचा खून केला होता. त्याचे इतर साथीदारही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते कारवाईपासून बचावले आहेत. पक्याच्या खुनानंतर समीरचा कांजी हाऊस चौक परिसरात दबदबा निर्माण झाल्याचे आरोपींना माहीत होते. ते समीरचा खून करून आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक