शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

बदला घेण्यासाठी झाला गुन्हेगाराचा खून, सहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:42 IST

तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देसूत्रधार फरार, नागपुरातील कांजी हाऊस हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.खुनाच्या घटनेत आर्यन गुप्ता, विजय पडोळे, राहुल बोकडे, महेश ऊर्फ सोनु सोनकुसरे, प्रदीप ऊर्फ बंटी कनपटे आणि एका आरोपीचा समावेश आहे. मंगळवारी रात्री यशोधरानगर ठाण्यांतर्गत कांजी हाऊस चौकात २३ वर्षाच्या समीरचा खून करण्यात आला होता. समीरने दोन अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने २०१७ मध्ये पाचपावलीचा गुन्हेगार पक्याचा खून केला होता. खुनानंतर एका वर्षात त्याची निर्दोष सुटका झाली होती. ‘लोकमत’ने पक्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा खुलासा केला होता. सुटका झाल्याच्या दोन वर्षानंतर खून झाल्यामुळे पोलिसांना बदला घेण्यासाठी खून झाला असे वाटत नव्हते. परंतु पकडलेल्या आरोपींची चौकशी केल्यामुळे या बाबीची पुष्टी झाली. सूत्रांनुसार समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आहे. तीन वर्षापूर्वी समीरने पक्याचा खून केला होता. घटनेच्या वेळी पक्यासोबत सात-आठ साथीदार होते. तरीही समीरने पक्यावर हल्ला करून त्याच्या साथीदारांना पळण्यास भाग पाडले. त्याने फरशीने डोके फोडून पक्याचा खून केला होता. समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार पक्याचे जवळचे मित्र होते. पक्याच्या खुनामुळे ते दु:खी झाले होते. पक्याचा खून झाल्यामुळे समीरचा परिसरात दबदबा निर्माण झाला होता. अंकुश आणि त्याच्या साथीदारांनी पक्याच्या खुनानंतर समीरला धडा दाखविण्याचे ठरविले होते. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर समीर शांत झाल्यामुळे आरोपी आपल्या कामात लागले. काही दिवसांपासून समीर आणि अंकुशमध्ये वाद सुरु झाला. सूत्रांनुसार ६ जानेवारीला सायंकाळी समीरचा विजय जगदाळेशी वाद झाला. समीरने त्याला धमकी दिली. त्यानंतर समीरचा अंकुश सूर्यवंशीसोबत वाद झाला. अंकुशला समीरने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. त्यानंतर अंकुश सूर्यवंशीने साथीदारांना समीरच्या खुनासाठी तयार केले. मंगळवारी सायंकाळी दारू पिल्यानंतर आरोपी समीरचा शोध घेत होते. कांजी हाऊस चौकाजवळ समीर त्यांना भेटला. त्यांनी चौकाजवळ बाईक उभी करून समीरकडे धाव घेतली. समीर जीव वाचविण्यासाठी पळत होता. तो रामचंद्र कुंभारेच्या आर. के. भोजनालयात घुसला.समीरने मागील दाराने भोजनालयात प्रवेश केला. समीरचा समोरच्या दाराने फरार होण्याचा विचार होता. त्याचा पाठलाग करून हल्लेखोर तेथे पोहोचले. भोजनालयाचे समोरचे गेट बंद असल्यामुळे समीरला पळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे तो आरोपींच्या हाती लागला. आरोपींनी जागीच त्याचा खून केला. जीव वाचल्यास समीर बदला घेईल असे आरोपींना वाटल्यामुळे त्यांनी त्याचा खून केला. अंकुश सूर्यवंशी आणि इतर आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे कारण कळू शकते. समीरच्या खुनानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यांच्या मते अवैध धंदे वाढल्यामुळे गुन्हेगार सक्रिय झाले असून पोलीस कमकुवत ठरत आहेत.धाक निर्माण करण्यासाठी कसरतपक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासोबतच आपला धाक निर्माण करण्यासाठी समीरचा खून केल्याची माहिती आहे. महेश सोनकुसरेने तीन वर्षापूर्वी पाचपावलीत एका गुन्हेगाराचा खून केला होता. त्याचे इतर साथीदारही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते कारवाईपासून बचावले आहेत. पक्याच्या खुनानंतर समीरचा कांजी हाऊस चौक परिसरात दबदबा निर्माण झाल्याचे आरोपींना माहीत होते. ते समीरचा खून करून आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक