शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Crime News: दररोजच्या भांडणाला कंटाळून नालासोपाऱ्यात पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 17:36 IST

Crime News: दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे.

-  मंगेश कराळे

नालासोपारा - दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे. 

नालासोपाऱ्याच्या लक्ष्मी नगरमधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आरोपी पती बंडू कवटे (४९) याने रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. मयत जयश्री कवटे (४५) आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. जयश्री या दहिसर येथे कामाला जायच्या. बंडू मागील तीन वर्षांपासून बेरोजगार असल्याने तो दारूच्या नशेत त्यांच्यासोबत सतत भांडण करायचा. या दोघांना २४ वर्षाचा मुलगा असून तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता.

शनिवारी रात्री असाच प्रकारचे भांडण झाले असता या भांडणाचा राग मनात ठेऊन त्याची पत्नी साखर झोपेत असताना त्याने तीची गळा आवळून हत्या केली. सकाळी शेजाऱ्याच्याने तुळींज पोलिसांना माहिती दिली. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार