शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

crime News: लुटमार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात, दहा लाख लंपास, व्यापाऱ्याला लुटून केला प्राणघातक हल्ला

By रवींद्र चांदेकर | Updated: August 18, 2022 19:50 IST

Crime News: माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती

- रवींद्र चांदेकर  यवतमाळ : माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती. या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अनिल शर्मा माहूर तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना खडका फाट्यानजीक त्यांची दुचाकी आरोपींनी अडविली. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्मा बॅग देत नसल्याचे बघून आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्त्याराने जीवघेणा हल्ला केला होता. यात शर्मा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची जवळपास दहा लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता.

जखमी अवस्थेत शर्मा जवळपास एक किलोमीटर अंतर चालत गेले. दरम्यान त्यांना तातडीने प्रथम पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बुधवारी रात्रीच नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नाकाबंदीचे आदेश दिले होते. दरम्यान महागाव पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. नॅशनल हायवे लगतच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली. या प्रकरणा एकूण सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.रविवारी बाजारपेठ बंदया घटनेमुळे हादरलेल्या व्यापाऱ्यांनी महागावची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी व्यापारी महासंघाने तहसीलदारांना निवेदन दिले. त्यातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान महागावचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पाच पथके रवाना केल्याचे सांगितले. लवकरच उर्वरित आरोपींना पोलीस अटक करतील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.तीन संशयितांना स्थानिक पोलीस व एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपींना अटक करणे तसेच लुटीतील रक्कम जप्त करणे बाकी आहे. - प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी