शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चुलत भावावर प्राणघातक हल्ला, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:31 IST

अभिषेक राजपूत या महाविद्यालयीन युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी सात तासांत गजाआड केले. जितेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (२४) असे आरोपीचे नाव असून, तो अभिषेकचा चुलत भाऊ आहे.

अलिबाग : अभिषेक राजपूत या महाविद्यालयीन युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी सात तासांत गजाआड केले. जितेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (२४) असे आरोपीचे नाव असून, तो अभिषेकचा चुलत भाऊ आहे.बुधवारी अभिषेकला डोक्यात, छातीवर आणि हाताला गंभीर दुखापत केल्याने तो कोमात गेल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवले होते.अभिषेक हा जेएसएम महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. अभिषेकचे वडील गोविंदसिंग राजपूत, आरोपी जितेंद्रचे वडील सुमेर सिंग राजपूत आणि तिसरे भाऊ आचल सिंग राजपूत यांचे अलिबाग तालुक्यात वावे येथे मिठाईचे दुकान आहे. अभिषेकचे वडील हे परिवारासोबत वावे येथेच राहतात, तर जितेंद्रसिंगचे वडील सुमेर सिंग राजपूत हे परिवारासह अलिबाग-विद्यानगर येथे राहतात.जितेंद्रचे राजस्थानमधील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. ते लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते; परंतु अभिषेकचे वडील गोविंदसिंग यांनी जितेंद्र हा चांगला मुलगा नाही, काम धंदा करत नाही, व्यसनी आहे, असे मुलीला सांगितले.काकाने आपल्याबद्दल वाईट सांगितल्यामुळे जितेंद्र चिडला होता. रागाच्या भरात त्याने मित्र चिरंजीव गंडाळे याला सोबत घेऊन अभिषेकला महाविद्यालयातून घेतले. बाइकवरून ते तिघे कुरूळच्या दत्त टेकडी परिसरात गेले. त्यानंतर जितेंद्रने चिरंजीवला बाहेर थांबण्यास सांगितले. जितेंद्र अभिषेकला तेथील एका पडक्या खोलीत घेऊन गेला. अभिषेकला काहीच कल्पना नव्हती की त्याला चुलत भाऊ मारणार आहे. जितेंद्रने तेथेच पडलेल्या बीअरच्या बाटलीने अभिषेकच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच छातीवर आणि हाताला गंभीर दुखापत केली.अभिषेक ओरडत असताना चिरंजीव तेथे आला. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अभिषेकला जितेंद्र मारत होता. चिरंजीव सोडवायला गेला त्या वेळी त्याच्या हातालाही दुखापत झाली. जितेंद्रने चिरंजीवला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अभिषेकला जखमी अवस्थेत जिल्हा सरकारी रुग्णालयात आणले.सीसीटीव्हीमुळे तपासाला गतीआरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनास्थळाच्या काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्याच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. दरम्यानच्या कालावधीत जितेंद्र मामाकडे, मुंबईला गेला होता.पोलिसांनी चिरंजीवला विश्वासात घेऊन घटना जाणून घेतली. त्यानंतर जितेंद्रच्या घरच्यांनाही विश्वासात घेतले. काहीच घडले नसल्याचे घरच्यांकरवी सांगून त्याला परत अलिबागला बोलावले. अलिबागच्या स्टॅण्डवर आल्यावर पोलिसांनी जितेंद्रला अटक केल्याचे अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटक