शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१ प्रेयसी, २ प्रियकर अन्..; दत्तक घेतलेल्या पोरीनेच आईबापाला संपवलं; पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:54 IST

निवृत्त कर्मचारी मुन्नालाल (६१) आणि त्यांची पत्नी राजदेवी (५५) हे त्यांची मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत बारा येथील ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते.

नवी दिल्ली - पैसा, संपत्ती आणि मालमत्ता हव्यासापोटी अनेक लोक असे गुन्हे करतात की ते ऐकून सगळेच हैराण होतात. असेच एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले होते. जिथे एका वृद्ध जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत होते. पण मारेकरी हाती सापडत नव्हते. मात्र जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पोलिसांसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. कारण खून करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून वृद्ध दाम्पत्याची मुलगी होती. जिने तिच्या प्रियकराच्या माध्यमातून हा गुन्हा केला होता आणि दोघांचे प्रेम फक्त २० दिवसांचे होते.

५ जुलै २०२२, कानपूरसकाळची वेळ होती, जेव्हा कानपूरच्या बारा परिसरातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ माजली. पहाटेच्या सुमारास राहत्या घरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून आत्महत्या केली. पण ही घटना जितकी भयंकर होती तितकीच त्यामागील कटाची कहाणीही अत्यंत भयानक आहे. ज्यानं लोक हैराण झाले आहेत. 

निवृत्त कर्मचारी मुन्नालाल (६१) आणि त्यांची पत्नी राजदेवी (५५) हे त्यांची मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत बारा येथील ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. तर मुलाचा पत्नीशी वाद झाला असून सून लग्नानंतर लगेचच घरातून निघून गेली होती. दरम्यान, ५ जुलै रोजी सकाळी वृद्ध दाम्पत्य त्यांच्या बेडवर मृतावस्थेत आढळले. कोणीतरी धारदार शस्त्राने दोघांचे गळे चिरले होते. 

या खळबळजनक घटनेच्या तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. ज्यामध्ये परिसरात राहणाऱ्या रोहित नावाच्या मुलाचे फोटो दिसत होते, जो रात्री उशिरा संशयास्पदरित्या घटनास्थळावरून जाताना दिसत होता. त्या आधारे पोलिसांनी रोहितला अटक केली. पोलिसांनी रोहितची कठोर चौकशी केली असता आरोपीने त्याने केलेला गुन्हा कबूल केला. पण तपासात पुढे जे काही बाहेर आले ते हैराण करणारे होते. रोहित हा कोमलचा दुसरा बॉयफ्रेंड होता, कोमत ही मृत जोडप्याची मुलगी होती, कोमलचा पहिला बॉयफ्रेंड रोहित खरा भाऊ राहुल होता, जो शिपाई आहे, तो मुंबईत तैनात होता.

घटनेच्या २० दिवस आधी फौजी राहुलने भाऊ रोहित आणि कोमलचं कॉन्फरन्स कॉलवरून बोलणं करून दिले होते. पण हा एक कॉन्फरन्स कॉल भावासाठी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. रोहित आता त्याचा भाऊ राहुलच्या गर्लफ्रेंडशी लपून बोलू लागला आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले, तर मुंबईत बसलेला पहिला प्रियकर राहुलला याची जाणीवही नव्हती.

दोन्ही भावांसोबत संबंध ठेवणारी कोमल तिच्या आई-वडिलांवर नाराज होती. खरंतर तिला रोहित किंवा राहुल या दोघांपैकी एकाशी लग्न करायचं होतं आणि घरचे लोक या नात्यासाठी तयार नव्हते. कोमलच्या भावाचं घटस्फोटाची प्रकरण चालू होतं आणि भावाच्या घटस्फोट प्रकरणात आई-वडिलांची संपत्ती हाताबाहेर जाण्याची भीती कोमलला वाटत होती. त्यामुळे तिने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आई-वडिलांसोबतच भावाच्या हत्येचा कट रचला आणि या कटात तिचा पहिला प्रियकर राहुलसह त्याचा भाऊ आणि कोमलचा दुसरा प्रियकर रोहितही सामील झाला.दुहेरी हत्याकांडाने पोलीस एक्शनमोडवर ५ जुलैच्या रात्री रोहितने कोमलसह मिळून वृद्ध दाम्पत्याची हत्या केली, मात्र सुदैवाने कोमलच्या भावाचा जीव वाचला. दुहेरी हत्याकांडानंतरच कानपूर पोलीस एक्शनमोडवर आले होते. पोलीस या प्रकरणाचा कट शोधण्यात व्यस्त होते. या कुटुंबातील चार लोकांपैकी दोन जणांची हत्या झाली होती, उर्वरित दोन लोक बाकी होते. यात वृद्ध दाम्पत्याची मुलगी कोमल आणि मुलगा अनूप उरले होते. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, कोमलला मुन्नालाल आणि राजदेवी यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून २४ वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. म्हणजेच त्यांना मुलगी नव्हती. यामुळेच त्यांनी कोमलला दत्तक घेऊन मोठ्या अभिमानाने मोठे केले. पण एक दिवस त्याची दत्तक मुलगी त्याच्या हत्येचे कारण बनेल हे त्याला फारसे माहित नव्हते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"