शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

खासगी लॅबमध्ये ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी तपासात निगेटिव्ह

By प्रविण मरगळे | Updated: September 24, 2020 13:18 IST

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला

ठळक मुद्देएका व्यक्तीच्या तक्रारीवरुन सरकारी अधिकाऱ्यांनी लॅबवर मारला छापा ३० जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सरकारी तपासात आला निगेटिव्ह खासगी लॅबला सरकारकडून सील, चौकशी करण्याचे दिले आदेश

कानपूर – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आतापर्यंत ५७ लाखांहून जास्त लोक बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासात ८६ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर पोहचली आहे. काही लोकांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या लॅबमध्ये ज्या ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांचा सरकारी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर प्रशासन जागं झालं असून सीएमओने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या रुग्णाने लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने दुसर्‍या प्रयोगशाळेतही त्याची चाचणी केली, मात्र त्याठिकाणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्या व्यक्तीने लॅबची तक्रार केली.

स्वत: डीएम जेव्हा तपासणी करायला आले तेव्हा तेथे आढळून आले की बर्‍याच रूग्णांची नावे व पत्ते आणि मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवली आहेत. डीएम आलोक तिवारी म्हणाले की, चुकीचे अहवाल देणे, पॉझिटिव्ह रूग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहणे, चाचणीसाठी जास्त पैसे घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लॅबला सील केले. एडीएम सिटीच्या देखरेखीखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती, ज्यात दोन एसीएमओचा समावेश होता. या समितीने लॅबची संपूर्ण चौकशी केली.

या चौकशीदरम्यान २० सप्टेंबरच्या तीन दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी रेकॉर्डची पडताळणी केली. लॅबने ज्या लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ३० कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अद्याप १२ रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत कानपूरचे डीएम आलोक तिवारी म्हणतात की, ज्ञान पॅथॉलॉजीने कोरोना पॉझिटिव्ह घोषित केलेल्या ३० लोकांकडून पुन्हा नमुने घेण्यात आले. आरटीपीसीआर तपास केला. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ३० पॉझिटिव्ह सहा दिवसांत निगेटिव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पण ज्ञान पॅथॉलॉजीचे संचालक डॉ अरुण कुमार म्हणतात की, तीन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊ शकतात. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना चाचणी रिपोर्ट देण्यात आला आहे. पुन्हा लोकांचे नमुने घेतले गेले त्यात मानकांचे पालन केले गेले आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. कदाचित डेटा फीडिंगमध्ये गडबड झाली असावी मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाही असा दावा त्यांनी केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या