शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खासगी लॅबमध्ये ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी तपासात निगेटिव्ह

By प्रविण मरगळे | Updated: September 24, 2020 13:18 IST

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला

ठळक मुद्देएका व्यक्तीच्या तक्रारीवरुन सरकारी अधिकाऱ्यांनी लॅबवर मारला छापा ३० जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सरकारी तपासात आला निगेटिव्ह खासगी लॅबला सरकारकडून सील, चौकशी करण्याचे दिले आदेश

कानपूर – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आतापर्यंत ५७ लाखांहून जास्त लोक बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासात ८६ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर पोहचली आहे. काही लोकांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या लॅबमध्ये ज्या ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांचा सरकारी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर प्रशासन जागं झालं असून सीएमओने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या रुग्णाने लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने दुसर्‍या प्रयोगशाळेतही त्याची चाचणी केली, मात्र त्याठिकाणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्या व्यक्तीने लॅबची तक्रार केली.

स्वत: डीएम जेव्हा तपासणी करायला आले तेव्हा तेथे आढळून आले की बर्‍याच रूग्णांची नावे व पत्ते आणि मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवली आहेत. डीएम आलोक तिवारी म्हणाले की, चुकीचे अहवाल देणे, पॉझिटिव्ह रूग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहणे, चाचणीसाठी जास्त पैसे घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लॅबला सील केले. एडीएम सिटीच्या देखरेखीखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती, ज्यात दोन एसीएमओचा समावेश होता. या समितीने लॅबची संपूर्ण चौकशी केली.

या चौकशीदरम्यान २० सप्टेंबरच्या तीन दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी रेकॉर्डची पडताळणी केली. लॅबने ज्या लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ३० कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अद्याप १२ रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत कानपूरचे डीएम आलोक तिवारी म्हणतात की, ज्ञान पॅथॉलॉजीने कोरोना पॉझिटिव्ह घोषित केलेल्या ३० लोकांकडून पुन्हा नमुने घेण्यात आले. आरटीपीसीआर तपास केला. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ३० पॉझिटिव्ह सहा दिवसांत निगेटिव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पण ज्ञान पॅथॉलॉजीचे संचालक डॉ अरुण कुमार म्हणतात की, तीन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊ शकतात. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना चाचणी रिपोर्ट देण्यात आला आहे. पुन्हा लोकांचे नमुने घेतले गेले त्यात मानकांचे पालन केले गेले आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. कदाचित डेटा फीडिंगमध्ये गडबड झाली असावी मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाही असा दावा त्यांनी केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या