शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

भयानक स्वप्न पडताहेत, झोप उडालीय! चिठ्ठी लिहून चोरट्यांनी परत केल्या मौल्यवान मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:56 IST

आठवड्यापूर्वी चोरीला गेलेल्या मूर्ती परत मिळाल्या; चोरट्यांनी परत आणून ठेवल्या

चित्रकूट: उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये एक अजब घटना घडली आहे. बालाजी मंदिरातून लाखो रुपयांचं मूल्य असलेल्या मूर्ती चोरीला गेल्या. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. चोरीला गेलेल्या मूर्ती माणिकपूरमधील महावीरनगरातील महंतांच्या घराबाहेर सापडल्या आहेत. या मूर्ती महंतांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. मात्र अष्टधातूच्या मूर्ती अद्यापही सापडलेल्या नाहीत.  

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या बालाजी मंदिरातून ९ मे रोजी अष्ट धातू, तांबं आणि पितळ्याच्या १६ मूर्ती चोरीला गेल्या. मंदिराचं कुलूप तोडून चोरांनी अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या श्रीरामाची ५ किलोची मूर्ती, राधाकृष्णाची पितळेची मूर्ती, बालाजी आणि लड्डू गोपालाच्या मूर्तीसह रोख रक्कम आणि चांदीचं सामान लंपास केलं, अशी माहिती मंदिराचे महंत राम बालक दास यांनी दिली. पुजाऱ्याची पत्नी सकाळी मंदिरात साफसफाई करण्यासाठी पोहोचली. त्यावेळी तिला मंदिराचं कुलूप तुटलं असल्याचं आणि मूर्ती चोरीला गेल्याचं लक्षात आलं.

घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. चोरीला गेलेल्या मूर्ती शनिवारी महंतांच्या घराबाहेर आढळून आल्या. महंत राम बालक दास गायींना चारा घालण्यासाठी जात असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली. मूर्ती चोरी केल्यापासून आम्हाला झोप येत नाहीए. भयानक स्वप्न पडत आहेत. त्यामुळे मूर्ती परत करत आहोत. या मूर्तींची मंदिरात प्रतिष्ठापना करा, असा मजकूर चिठ्ठीत होता.

चिठ्ठी वाचल्यानंतर महंत राम बालक दास यांनी मूर्ती शोधण्यास सुरुवात केली. घराच्या बाहेर असलेल्या टोपलीखाली त्यांना मूर्ती दिसल्या. एका गोणीमध्ये मूर्ती ठेवलेल्या होत्या. पितळ आणि तांब्याच्या १२ मूर्ती त्यांना आढळल्या. मात्र अष्टधातूच्या दोन मूर्ती सापडल्या नाहीत. महंतांनी मूर्ती सापडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि मूर्ती त्यांना सुपूर्द केल्या.