शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:32 IST

कोळगाव ग्रामस्थांनी पकडला साठा : रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांना आजार

पालघर : कोळगावच्या जेनेसिस औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर ३ येथील एका गोडाऊनमधील सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जैविक टाकाऊ रासायनिक कचºयाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. सोमवारी ग्रामस्थांनी हा साठा पकडून तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

जेनेसिस इंडस्ट्रीमध्ये गाळ्यात जैविक टाकाऊ रसायनांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. त्या रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकºयांना उलट्या होणे, चक्कर, मळमळणे अशा आजारांनी ग्रासले होते. या दुर्गंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. परंतु शोध लागत नव्हता. सोमवारी ग्रामस्थांनी या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रसायनाचा शोध घेतला. दीड महिन्यांपासून या गोदामातून जैविक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांना या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेले ३५० ड्रम, शेकडो गोण्या भरलेला कचरा आदी मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळून आला. मालकाला ही बाब कळताच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास येथे असलेला हा घातक कचरा ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचवेळी कोळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे रोखले. यावेळी ट्रक चालक आणि तेथे काम करणारे मजूर हे लागलीच पळून गेले. येथे उपस्थित कंपनीचा सुपरवायझर राकेश रॉय हा ग्रामस्थांच्या हाती लागला. राकेश रॉयला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अजगर अली नामक व्यक्ती याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सूत्रधाराला पकडल्यास आपल्या कारखान्यातील टाकाऊ जैविक कचरा देणाºया कारखानदारांचे बिंग फुटून या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून रसायनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रसायनांमुळे जिल्ह्यात प्रदूषणाची मात्रा वाढत जाऊन भूगर्भातील पाणीसाठे प्रदूषित झाले आहेत.लोकांच्या जीवाशी खेळएमआयडीसी तारापूर आणि पालघरमधील काही कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ जैविक तसेच रासायनिक कचरा नवी मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पाठविण्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी कचºयाची विल्हेवाट लावणाºया टोळ्यांकडे तो सोपवतात. पैशासाठी लोकांच्या आणि पर्यावरणाच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. या टोळ्यांकडे हा कचरा सोपविल्यानंतर तो एखाद्या रस्त्याच्या निर्जन स्थळी अथवा नदी, नाले, शेतात फेकला जातो.