शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:32 IST

कोळगाव ग्रामस्थांनी पकडला साठा : रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांना आजार

पालघर : कोळगावच्या जेनेसिस औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर ३ येथील एका गोडाऊनमधील सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जैविक टाकाऊ रासायनिक कचºयाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. सोमवारी ग्रामस्थांनी हा साठा पकडून तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

जेनेसिस इंडस्ट्रीमध्ये गाळ्यात जैविक टाकाऊ रसायनांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. त्या रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकºयांना उलट्या होणे, चक्कर, मळमळणे अशा आजारांनी ग्रासले होते. या दुर्गंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. परंतु शोध लागत नव्हता. सोमवारी ग्रामस्थांनी या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रसायनाचा शोध घेतला. दीड महिन्यांपासून या गोदामातून जैविक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांना या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेले ३५० ड्रम, शेकडो गोण्या भरलेला कचरा आदी मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळून आला. मालकाला ही बाब कळताच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास येथे असलेला हा घातक कचरा ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचवेळी कोळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे रोखले. यावेळी ट्रक चालक आणि तेथे काम करणारे मजूर हे लागलीच पळून गेले. येथे उपस्थित कंपनीचा सुपरवायझर राकेश रॉय हा ग्रामस्थांच्या हाती लागला. राकेश रॉयला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अजगर अली नामक व्यक्ती याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सूत्रधाराला पकडल्यास आपल्या कारखान्यातील टाकाऊ जैविक कचरा देणाºया कारखानदारांचे बिंग फुटून या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून रसायनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रसायनांमुळे जिल्ह्यात प्रदूषणाची मात्रा वाढत जाऊन भूगर्भातील पाणीसाठे प्रदूषित झाले आहेत.लोकांच्या जीवाशी खेळएमआयडीसी तारापूर आणि पालघरमधील काही कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ जैविक तसेच रासायनिक कचरा नवी मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पाठविण्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी कचºयाची विल्हेवाट लावणाºया टोळ्यांकडे तो सोपवतात. पैशासाठी लोकांच्या आणि पर्यावरणाच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. या टोळ्यांकडे हा कचरा सोपविल्यानंतर तो एखाद्या रस्त्याच्या निर्जन स्थळी अथवा नदी, नाले, शेतात फेकला जातो.