शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांच्याविराेधातील ‘चॅप्टर केस’ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 06:44 IST

Arnab Goswami : याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबई : सहा महिन्यांच्या कालावधीत निकाल देण्यास असमर्थ ठरल्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध सुरू केलेली चॅप्टर केस बंद करावी लागली. शनिवारी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर (वरळी विभाग) यांनी हा आदेश दिला आहे. 

पालघर हत्याकांड आणि वांद्रे स्थानकातील स्थलांतरित श्रमिकांच्या गर्दीबाबत प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी वरळी न्यायालयाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी गोस्वामी यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिते (सीआरपीसी)च्या कलम १०८ नुसार कारवाई सुरू केली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत भविष्यात असे होऊ नये म्हणून बाँड का लिहून घेऊ नये, याबाबत विचारणा करण्यात आली होती.

या घटनेला गोस्वामींनी जातीय रंग देऊन हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय तणाव भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे या नोटिसीमध्ये नमूद केले होते, तसेच त्या कव्हरेजमुळे वांद्रे स्थानकात गर्दी उसळली. याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या प्रस्तावानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली.

असामाजिक घटकांवर (गंभीर फौजदारी आरोपांना सामोरे जाणे) नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी घेतलेली एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून चॅप्टर केस घेतली जाते. सहा महिन्यांत ती निकाली काढणे बंधनकारक आहे. मात्र, याप्रकरणी चौकशी ६ महिन्यांत पूर्ण न झाल्यामुळे गोस्वामी यांच्या वकिलाने गेल्या आठवड्यात फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ११६(६)नुसार अर्ज करीत नोटीस चॅप्टर केस रद्द करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही सुनावणी रद्द करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर (वरळी विभाग) यांनी तसे आदेश दिले.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी