शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 12:48 IST

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४ हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे वाढते जाळे रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असल्याचे दाखल गुन्ह्यांच्या उकलीवरून समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित ३२३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या २१ गुन्ह्यांची उकल करत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४  हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यात सायबर फसवणुकी संदर्भात २१७० गुन्ह्यांचा समावेश असून त्यापैकी अवघ्या ९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापाठोपाठ यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३२३ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये, क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीचे १०० आणि नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे सर्वाधिक १६ गुन्हे नोंदविले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. 

‘बी’चा ‘डी’झाला अन्ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकाराने गेल्यावर्षी २०  ऑगस्ट रोजी सोहम रॉक स्टार एंटरटेनमेंट वर्सोवा कंपनीसोबत गाण्यांचे साडेएकवीस लाख रुपये देण्याचा करार केला. कराराचे पैसे देण्याबाबत गीतकाराच्या  कंपनीकडून ईमेलद्वारे इन्व्हाईस पाठविले होते. ठगाने याच ईमेलमध्ये ‘बी’ चा ‘डी’ करून संबंधित कंपनीला पाठवून दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. संबंधित कंपनीने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे न मिळाल्याने गीतकाराच्या अकाउंटंटच्या तक्रारीवरून ओशिवरा पथकाने खात्याचा तपशील मिळवून तपास सुरू केला. पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यात ११ लाखांची रक्कम असल्याचे समजताच ते खाते गोठवत रक्कम दिली. 

गोल्डन अवरमुळे वाचताहेत पैसे...तक्रारदाराने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तत्काळ फ्रीझ करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. 

बँकेचे सहकार्य महत्त्वाचेनागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवरमुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच बँकांचे सहकार्यही महत्त्वाचे असते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम