शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 12:48 IST

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४ हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे वाढते जाळे रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असल्याचे दाखल गुन्ह्यांच्या उकलीवरून समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित ३२३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या २१ गुन्ह्यांची उकल करत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४  हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यात सायबर फसवणुकी संदर्भात २१७० गुन्ह्यांचा समावेश असून त्यापैकी अवघ्या ९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापाठोपाठ यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३२३ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये, क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीचे १०० आणि नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे सर्वाधिक १६ गुन्हे नोंदविले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. 

‘बी’चा ‘डी’झाला अन्ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकाराने गेल्यावर्षी २०  ऑगस्ट रोजी सोहम रॉक स्टार एंटरटेनमेंट वर्सोवा कंपनीसोबत गाण्यांचे साडेएकवीस लाख रुपये देण्याचा करार केला. कराराचे पैसे देण्याबाबत गीतकाराच्या  कंपनीकडून ईमेलद्वारे इन्व्हाईस पाठविले होते. ठगाने याच ईमेलमध्ये ‘बी’ चा ‘डी’ करून संबंधित कंपनीला पाठवून दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. संबंधित कंपनीने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे न मिळाल्याने गीतकाराच्या अकाउंटंटच्या तक्रारीवरून ओशिवरा पथकाने खात्याचा तपशील मिळवून तपास सुरू केला. पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यात ११ लाखांची रक्कम असल्याचे समजताच ते खाते गोठवत रक्कम दिली. 

गोल्डन अवरमुळे वाचताहेत पैसे...तक्रारदाराने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तत्काळ फ्रीझ करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. 

बँकेचे सहकार्य महत्त्वाचेनागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवरमुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच बँकांचे सहकार्यही महत्त्वाचे असते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम