शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

२५ लाखांची सुपारी देत बिल्डरची हत्या, चौघांना अटक; गुजरातच्या साई गावातील वाद ठरला कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 05:52 IST

मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत.

नवी मुंबई : नेरूळ येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई गावात बिल्डर सवजी मंजेरी यांची असलेली कथित दहशत मोडण्यासाठी व त्यांनी केलेल्या कथित हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या हत्येची २५ लाखांना सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत.

बिल्डर सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरूळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. नेरूळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित दुचाकी आढळली होती. त्यावरून पोलिसांनी मेहेक नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) यांना अटक केली.

मेहेक हा मूळचा गुजरातचा असून, गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी त्याने ओएलएक्सवरून खरेदी करून दिली होती. त्या दुचाकीवरून कौशल व सोनूकुमार याने मंजेरी यांच्यावर पाळत ठेवून कौशलने गोळ्या झाडल्या होत्या.

दुचाकी हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाचा धागा पकडून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला. मेहेक नारियाला गुजरातमधून ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकऱ्यांची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तत्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून, दोन दिवसांत त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हत्येनंतर मंदिरात अभिषेकबुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक केला होता. हा प्रकार तेथील नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनाही मिळाली होती.

नवी मुंबईतील प्रकरणाचा उलगडासवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई गावात दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचाही गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर सवजी यांनी गावात दरारा निर्माण केला होता. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाइकांसोबत त्यांचा वाद झाला होता. यामुळे सवजी आपला सूड घेणार या भीतीने त्यांच्या हत्येची २५ लाखांची सुपारी दिली. त्यापैकी एक लाख रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते.

टॅग्स :Arrestअटक