शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

खळबळजनक! मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 09:04 IST

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली असा आरोप मुलाच्या घरच्यांनी लावला आहे.

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका मुलाने मुलीला घरातून पळवून नेत लग्न केल्याने त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांना पोलीस स्टेशनसमोरुनच मुलीच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यानंतर संतापलेले नातेवाईकांनी मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली.

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर मुलीच्या घरचे पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. मुलगा आणि मुलगी जसे पोलीस ठाण्याबाहेर निघाले तेव्हा त्या दोघांना बळजबरीनं उचलून घेऊन गेले. गंभीररित्या जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मृत्यूशी संघर्ष करत आहे. मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, २३ वर्षीय युवक कुटुंबासह राजौरी गार्डन टीसी कॅम्प परिसरात राहत होता. सूरज आणि रोशनी (बदललेलं नाव) एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी १५-२० दिवसांपूर्वी घरातून पळून जात लग्न केले. त्यानंतर जीवाला धोका आहे असं सांगत बुधवारी संध्याकाळी ५ वाजता राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात पोहचले. दोघांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले.

मुलाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी फोन करुन माहिती दिली तेव्हा तिचे नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर पोहचले. पोलिसांकडून सुरक्षा मिळालीच नाही मात्र पोलीस ठाण्याबाहेरुनच दोघांचं अपहरण करुन सागरपूरला घेऊन गेले. त्याठिकाणी सूरजला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. रक्ताच्या थारोळ्यात सूरजला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सूरजची अवस्था गंभीर असून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत गौतम म्हणाले की, पोलिसांनी सफदरजंग हॉस्पिटलमधून सूचना मिळाली होती. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पीडित मुलगा राजौरी गार्डन टीसी कॅम्प येथे राहण्यास होता तर मुलगी सागरपूर परिसरात राहायला होती. दोघंही बुधवारी दिल्लीत आले होते. तर मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मुलीच्या घरच्यांनी दुसरीकडून मुलीने पळून जात लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीनं उचलून नेत सागरपूर परिसरात घेऊन गेले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि अपहरण याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली