शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खळबळजनक! मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 09:04 IST

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली असा आरोप मुलाच्या घरच्यांनी लावला आहे.

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी एका मुलाने मुलीला घरातून पळवून नेत लग्न केल्याने त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांना पोलीस स्टेशनसमोरुनच मुलीच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यानंतर संतापलेले नातेवाईकांनी मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली.

लग्नानंतर मुलाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा आणि मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर मुलीच्या घरचे पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. मुलगा आणि मुलगी जसे पोलीस ठाण्याबाहेर निघाले तेव्हा त्या दोघांना बळजबरीनं उचलून घेऊन गेले. गंभीररित्या जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो मृत्यूशी संघर्ष करत आहे. मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, २३ वर्षीय युवक कुटुंबासह राजौरी गार्डन टीसी कॅम्प परिसरात राहत होता. सूरज आणि रोशनी (बदललेलं नाव) एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी १५-२० दिवसांपूर्वी घरातून पळून जात लग्न केले. त्यानंतर जीवाला धोका आहे असं सांगत बुधवारी संध्याकाळी ५ वाजता राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात पोहचले. दोघांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले.

मुलाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी फोन करुन माहिती दिली तेव्हा तिचे नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर पोहचले. पोलिसांकडून सुरक्षा मिळालीच नाही मात्र पोलीस ठाण्याबाहेरुनच दोघांचं अपहरण करुन सागरपूरला घेऊन गेले. त्याठिकाणी सूरजला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. रक्ताच्या थारोळ्यात सूरजला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सूरजची अवस्था गंभीर असून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत गौतम म्हणाले की, पोलिसांनी सफदरजंग हॉस्पिटलमधून सूचना मिळाली होती. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पीडित मुलगा राजौरी गार्डन टीसी कॅम्प येथे राहण्यास होता तर मुलगी सागरपूर परिसरात राहायला होती. दोघंही बुधवारी दिल्लीत आले होते. तर मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. मुलीच्या घरच्यांनी दुसरीकडून मुलीने पळून जात लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीनं उचलून नेत सागरपूर परिसरात घेऊन गेले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि अपहरण याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली