शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

खळबळजनक! FB Live करत आईवडिलांसह मुलानं स्वत:चं आयुष्य संपवलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:02 IST

स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला घेऊन गेले.

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. कुटुंबाला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आले आहे. कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह करत याबद्दल सांगितले. या घटनेनंतर परगाना जिल्ह्यातील बकखाली परिसरात खळबळ माजली आहे. ८ जानेवारीला एका जंगलात जात कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.

कुटुंबाने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह सुरुच ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना आढळले की, मृतकांमध्ये अशोक नस्कर, त्यांची पत्नी रिता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर यांचा समावेश आहे. अशोक आणि रिता यांची मुलगी पूनम एका संस्थेशी जोडलेली आहे. तिच्यावर संस्थेचे १४ लाख रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला. ८ जानेवारीला सकाळी संस्थेच्या काही महिला नस्कर कुटुंबाच्या घरी पोहचल्या. महिलेने पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानित केले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला घेऊन गेले. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही घराबाहेर काढत घराला कुलूप लावलं. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम आणि तिच्या पतीला रस्सी बांधून संपूर्ण गावात फिरवले गेले. तसेच एका झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत कळालं की, याच अपमानामुळे अशोक, रिता आणि अभिषेक या तिघांनी एका जंगलात जात आत्महत्या केली. सध्या पूनमला पोलिसांनी रेस्क्यू केले आहे. जेव्हा या घटनेचा फेसबुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तेव्हा पोलिसांना याची माहिती कळाली. पोलिसांनी या प्रकरणात स्वनिर्भर संस्थेच्या ५ महिलांना ताब्यात घेतले असून आणखी काहींची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल