शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिअर बॉटल अन् ७ हजारांचं बिल, लाथा-बुक्क्यांनी झाला हल्ला; युवकाच्या हत्येमागं नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:05 IST

पोलिसांनी बृजेशचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले.

नोएडा – गॅलरिया मॉलमध्ये झालेल्या बृजेश राय हत्याकांडात नवीन खुलासा समोर आला आहे. बिअर बॉटल मोजण्यात गडबड झाल्यामुळे वादाला सुरुवात झाली. त्यातून बृजेश रायचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे तर इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. बृजेश राय एका बॅटरी बनवणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते. अलीकडेच मुंबईहून हे कुटुंब नोएडा येथे शिफ्ट झाले होते.

मागील सोमवारी नोएडाच्या सेक्टर ३९ येथे गार्डन गॅलरिया मॉलमध्ये लोस्ट लेमन रेस्टॉरंटमध्ये ते पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी इतर ५ मित्र हजर होते. रात्री उशीरा पार्टी संपल्यानंतर रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना ७ हजार बिल दिले. ज्यात बिअर बॉटलचा चार्जही समावेश होता. बृजेश राय आणि त्याच्या मित्रांनी जितक्या बिअर प्यायल्या त्याहून अधिक बिलात दाखवण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे बिलातून रक्कम वगळावी अशी मागणी बृजेश राय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली. त्यात वाद निर्माण झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की हॉटेल सिक्युरिटी गार्ड आणि बृजेश राय मित्रांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी बृजेश रायवर सर्वांनी हल्ला केला. यात बृजेशला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली. त्यात गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत बृजेशला पारस रुग्णालयात भरती केले. ज्याठिकाणी उपचारावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी बृजेशचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले.

मृत बृजेश रायच्या मित्रांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर हत्येच्या आरोपाखाली ९ जणांची ओळख पटवली. यात २ मॉल सिक्युरिटी गार्ड, ५ हॉटेल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून इतर २ जणांचा शोध घेतला जात आहे. ४ महिन्यापूर्वीच नवीन नोकरी मिळाल्यानंतर बृजेश राय कुटुंबासह मुंबईहून नोएडा येथे शिफ्ट झाला होता.

मृत बृजेशच्या पत्नीने सांगितले की, मला या घटनेबाबत कुणीही माहिती दिली नाही. पतीसोबत असलेल्या मित्रांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल आहे. नवऱ्यासोबत असलेल्या मित्रांचीही चौकशी करा अशी मागणी पत्नीने केली आहे. पूजाने म्हटलंय की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच्या मित्रांनी मला का कळवलं नाही? जेव्हा बृजेश रात्र झाली तरी घरी परतला नाही तेव्हा कॉल केला असता या घटनेची माहिती कळाली असं मृत बृजेशच्या पत्नीने सांगितले.