शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:00 IST

चार तरुणींसह सर्वांवर होती ३२ लाखाचे इनाम

ठळक मुद्देआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते.

मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त भागातील कुख्यात समजल्या जाणाऱ्या उपदलम प्रमुख गोकुल मडावीसह सहा माओवाद्यांनी आत्मसपर्मण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नर्मदा या वरिष्ठ माओवाद्याच्या अटकेनंतर संघटनेतील वाढते मतभेद आणि नक्षलविरोधी अभियानाच्या मुख्य हेतूचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (वय ३०),रतन उर्फ मुन्ना भिगारी कुंजामी (२२), सरिसा उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०), शैला उर्फ राजे मंगळू हेडो(२०),जरिना उर्फ शांती दानू होयामी ((२९) व मिना धुर्वा (२२) अशी त्यांची नावे असून त्यांच्या शरणागतीमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाल्याचे समजले जाते.मडावी हा १२ वर्षापूर्वी पेरमिली दलममध्ये भरती झाला होता. सहा वर्षापूर्वी तो कंपनी क्रमांक -४मध्ये पी.पी.सी.एम. व २०१७मध्ये डीव्हीसी (उपदलम प्रमुख) म्हणून काम पहात होता. त्याच्यावर १५ चकमकीचे तर ३ खूनाचे गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्यासाठी सरकारने ८ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यासह मुन्ना भिकारी हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलमध्ये भरती होवून २०१९ पर्यत प्लाटुन क्रं.११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. मौजा विजापूर घाट व आयपेंटा चकमकीत तो सहभागी होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाखाचे बक्षीस होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावरही ५ लाकाचे बक्षीस जाहीर होते. जरीना उर्फ शांती ही गेल्या १२ वर्षापासून माओवादी चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर ८ चकमकीच्या गुन्ह्यासह एकुण १९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर सरकारने ५ लाखाचे बक्षीस लावले होते. शैला व मीना धुर्वा या गेल्या वर्षभरापासून माओवादी संघटनेत सक्रीय होत्या. त्यांच्यावर जाळपोळीसह चकमकीचे गुन्हे दाखल होते. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते. सहा माओवाद्यांनी शासनाकडून राबविल्या जात असलेल्या आत्मसमर्पण योजनेचे महत्व पटल्याने त्यांनी गडचिरोली येथील अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील योजनेत शरणागती पत्करली.आत्मसमर्पणामुळे मुख्य प्रवाहात येण्याची संधीमाडवी व त्याच्या सहकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आत्मसर्मपण योजना महत्वाची आहे. नक्षलवादी कृत्यामुळे दुर्गम व अति दुर्गम भागातील विकास वंचित राहिला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी युवकांनी शासनाच्या योजनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचा हकनाक बळी जाणार आहे. - राजेंद्र सिंह ( अप्पर महासंचालक, नक्षलविरोधी विशेष अभियान) 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली