शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:00 IST

चार तरुणींसह सर्वांवर होती ३२ लाखाचे इनाम

ठळक मुद्देआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते.

मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त भागातील कुख्यात समजल्या जाणाऱ्या उपदलम प्रमुख गोकुल मडावीसह सहा माओवाद्यांनी आत्मसपर्मण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नर्मदा या वरिष्ठ माओवाद्याच्या अटकेनंतर संघटनेतील वाढते मतभेद आणि नक्षलविरोधी अभियानाच्या मुख्य हेतूचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (वय ३०),रतन उर्फ मुन्ना भिगारी कुंजामी (२२), सरिसा उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०), शैला उर्फ राजे मंगळू हेडो(२०),जरिना उर्फ शांती दानू होयामी ((२९) व मिना धुर्वा (२२) अशी त्यांची नावे असून त्यांच्या शरणागतीमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाल्याचे समजले जाते.मडावी हा १२ वर्षापूर्वी पेरमिली दलममध्ये भरती झाला होता. सहा वर्षापूर्वी तो कंपनी क्रमांक -४मध्ये पी.पी.सी.एम. व २०१७मध्ये डीव्हीसी (उपदलम प्रमुख) म्हणून काम पहात होता. त्याच्यावर १५ चकमकीचे तर ३ खूनाचे गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्यासाठी सरकारने ८ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यासह मुन्ना भिकारी हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलमध्ये भरती होवून २०१९ पर्यत प्लाटुन क्रं.११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. मौजा विजापूर घाट व आयपेंटा चकमकीत तो सहभागी होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाखाचे बक्षीस होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावरही ५ लाकाचे बक्षीस जाहीर होते. जरीना उर्फ शांती ही गेल्या १२ वर्षापासून माओवादी चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर ८ चकमकीच्या गुन्ह्यासह एकुण १९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर सरकारने ५ लाखाचे बक्षीस लावले होते. शैला व मीना धुर्वा या गेल्या वर्षभरापासून माओवादी संघटनेत सक्रीय होत्या. त्यांच्यावर जाळपोळीसह चकमकीचे गुन्हे दाखल होते. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते. सहा माओवाद्यांनी शासनाकडून राबविल्या जात असलेल्या आत्मसमर्पण योजनेचे महत्व पटल्याने त्यांनी गडचिरोली येथील अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील योजनेत शरणागती पत्करली.आत्मसमर्पणामुळे मुख्य प्रवाहात येण्याची संधीमाडवी व त्याच्या सहकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आत्मसर्मपण योजना महत्वाची आहे. नक्षलवादी कृत्यामुळे दुर्गम व अति दुर्गम भागातील विकास वंचित राहिला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी युवकांनी शासनाच्या योजनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचा हकनाक बळी जाणार आहे. - राजेंद्र सिंह ( अप्पर महासंचालक, नक्षलविरोधी विशेष अभियान) 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली