शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:00 IST

चार तरुणींसह सर्वांवर होती ३२ लाखाचे इनाम

ठळक मुद्देआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते.

मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त भागातील कुख्यात समजल्या जाणाऱ्या उपदलम प्रमुख गोकुल मडावीसह सहा माओवाद्यांनी आत्मसपर्मण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नर्मदा या वरिष्ठ माओवाद्याच्या अटकेनंतर संघटनेतील वाढते मतभेद आणि नक्षलविरोधी अभियानाच्या मुख्य हेतूचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (वय ३०),रतन उर्फ मुन्ना भिगारी कुंजामी (२२), सरिसा उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०), शैला उर्फ राजे मंगळू हेडो(२०),जरिना उर्फ शांती दानू होयामी ((२९) व मिना धुर्वा (२२) अशी त्यांची नावे असून त्यांच्या शरणागतीमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाल्याचे समजले जाते.मडावी हा १२ वर्षापूर्वी पेरमिली दलममध्ये भरती झाला होता. सहा वर्षापूर्वी तो कंपनी क्रमांक -४मध्ये पी.पी.सी.एम. व २०१७मध्ये डीव्हीसी (उपदलम प्रमुख) म्हणून काम पहात होता. त्याच्यावर १५ चकमकीचे तर ३ खूनाचे गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्यासाठी सरकारने ८ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यासह मुन्ना भिकारी हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलमध्ये भरती होवून २०१९ पर्यत प्लाटुन क्रं.११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. मौजा विजापूर घाट व आयपेंटा चकमकीत तो सहभागी होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाखाचे बक्षीस होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावरही ५ लाकाचे बक्षीस जाहीर होते. जरीना उर्फ शांती ही गेल्या १२ वर्षापासून माओवादी चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर ८ चकमकीच्या गुन्ह्यासह एकुण १९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर सरकारने ५ लाखाचे बक्षीस लावले होते. शैला व मीना धुर्वा या गेल्या वर्षभरापासून माओवादी संघटनेत सक्रीय होत्या. त्यांच्यावर जाळपोळीसह चकमकीचे गुन्हे दाखल होते. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते. सहा माओवाद्यांनी शासनाकडून राबविल्या जात असलेल्या आत्मसमर्पण योजनेचे महत्व पटल्याने त्यांनी गडचिरोली येथील अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील योजनेत शरणागती पत्करली.आत्मसमर्पणामुळे मुख्य प्रवाहात येण्याची संधीमाडवी व त्याच्या सहकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आत्मसर्मपण योजना महत्वाची आहे. नक्षलवादी कृत्यामुळे दुर्गम व अति दुर्गम भागातील विकास वंचित राहिला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी युवकांनी शासनाच्या योजनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचा हकनाक बळी जाणार आहे. - राजेंद्र सिंह ( अप्पर महासंचालक, नक्षलविरोधी विशेष अभियान) 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली