शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशी महिला प्रकरण:  रेश्मा खानच्या याच जन्मदाखल्यामुळे प्रकरण झाले 'ट्रिगर' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 10:51 IST

पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाचे पडताळणीपत्रही 'लोकमत' च्या हाती. आता 'सीआययु' च्या कारवाईकडे पोलीस खात्याचे लक्ष

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: भारतीय पासपोर्ट बनविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी शाहीन हैदर आझम यांची बांग्लादेशी असलेली दुसरी पत्नी रेश्मा खान हिने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आय ब्रँचचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांनी केला आहे. तिच्या जन्मदाखल्यामुळे तिच्यावर सर्वात आधी पोलिसांना संशय आला होता आणि हे प्रकरण 'ट्रिगर' झाले. हा दाखला आणि पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाने दिलेला पडताळणी अहवाल 'लोकमत' च्या हाती लागला आहे, ज्यात त्यांच्याकडे खानच्या जन्मनोंदीचे काही रेकॉर्डच नसल्याचे उघड होत आहे. त्यानुसार गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) याप्रकरणी पुढे काय कारवाई करते? याकडे संपूर्ण पोलीस खात्याचे लक्ष लागले आहे.

कुरुलकर यांनी सीआययुला दिलेल्या जबाबानुसार, रेश्माची जन्मतारीख १६ फेब्रुवारी १९८९ असे नमुद केलेला आणि १९ जुलै १९९७ रोजी जारी करण्यात आलेला जन्मदाखला तिने पासपोर्ट मिळण्यासाठी दिला होता, जो पश्चिम बंगाल येथून जारी करण्यात आल्याचे दिसत होते.

हाच तो जन्मदाखला ज्यामुळे पहिल्यांदा आय ब्रँचला रेश्मा खानवर संशय आला आणि त्यांनी तो पडताळणीसाठी वेस्ट बंगालच्या संबंधित विभागाकडे पाठवला.

मात्र त्यातील मजकुराच्या ठळक भागाची पाहणी केली असता वरील भाग स्टॅम्पचा आणि त्याखाली गाळलेल्या जागी हस्ताक्षरे दिसून आल्याने तो बोगस असल्याचा संशय त्यांना आला. या जन्म दाखल्याची पडताळणी पश्चिम बंगालच्या डिस्ट्रिक्ट रेकॉर्ड अँड कोपीइंग सेक्शन ,नॉर्थ २४ पारगनास बारसात येथील शासकीय अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याकडे रेश्मा खानच्या जन्मनोंदीचे रेकॉर्डच नसल्याची माहिती आय ब्रँचच्या पडताळणी पथकाला मिळाली.

पश्चिम बंगालच्या संबंधित विभागाने दाखला बोगस असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले. त्याचा हा पुरावा लोकमतकडे आहे.

सदर जन्मदाखला, त्याचे संबंधित विभागाकडून आलेले पडताळणी पत्र 'लोकमत' च्या हाती लागले आहे. तिने पासपोर्ट मिळविण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांपैकी हा दाखला असल्याने तो बोगस असल्याचे उघड झाले आहे. याबाबत कुरुलकर यांना मोबाईल आणि मेसेज करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. दरम्यान सीआययुचे याप्रकरणी पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश