शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून २ तरुणांवर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 23:12 IST

काही दिवसांपासून कल्याणमध्ये भर रस्त्यात गावगुंडाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

कल्याण - कल्याण पूर्वेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता पुन्हा एकदा कल्याण पूर्व एका गंभीर घटनेनं हादरले आहे. धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पुर्वेतील काका ढाबा परिसरात  घडली आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे. 

विजय दुबे आणि संतोष प्रजापती हे दोघे व्यावसायिक दुकान बंद करुन पान खाण्यासाठी टपरीवर गेले होते. या ठिकाणी धक्का लागला म्हणून  काही तरुणांनी धारदार शस्त्र आणि काठी घेऊन या दोघांवर हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.  दरम्यान, काही दिवसांपासून कल्याणमध्ये भर रस्त्यात गावगुंडाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी चिकणी पाडा परिसरात काही गुंडांनी रिक्षाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता . महिनाभरापूर्वी चक्की नाका परिसरात देखील अशाच प्रकारे काही तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली होती..कल्याण पूर्वेत सुरक्षारक्षकावर देखील प्राणघातक हल्ला झाला होता.तर  एका बिल्डरने रहिवाशाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.  इतकंच नाही तर तरुण -तरुणींना भर रस्त्यात बेदम मारहाण  झाल्याच्या घटनेने तीव्र पडसाद  राज्यभरात उमटले होते.  

या सर्व घटना पाहाता कल्याण पूर्व यूपी - बिहार होण्याच्या मार्गावर आहे की काय? असा सवाल निर्माण झाला आहे. तसेच पोलीस यंत्रणाही हे सर्व प्रकार रोखण्यास कुठेतरी कमी पडत आहे हे देखील नाकारता येणार नाही.

टॅग्स :Policeपोलिस