शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशच्या दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर; तब्बल ३०० कोटींचे होते मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:07 IST

प्रचंड दहशत असलेल्या दोन गोतस्कर भावांचा पोलिसांकडून एन्काऊंटर; एकावर होतं २ लाखांचं बक्षीस

गुवाहाटी: उत्तर प्रदेशातील दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. दोघे मेरठचे रहिवासी होते. १३ एप्रिलला दोघांना अटक झाली. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. १४ एप्रिलला त्यांना आसामच्या कोकराझारमध्ये आणण्यात आलं. एन्काऊंटर दरम्यान चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

अकबर बंजारा आणि सलमान अशी एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या गोतस्करांची नावं आहेत. अकबर बंजारावर २ लाख रुपयांचं बक्षीस होतं. उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर आसाम पोलिसांनी दोन्ही गोतस्करांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली. अकबर बंजारा आणि सलमान मंगळवारी पोलीस कोठडीतून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.

कोकराझारमध्ये गोतस्कर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन्ही तस्कर मारले गेले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. अकबरनं तस्करीच्या उद्योगाचा विस्तार आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मिझोरमपर्यंत केला होता. बंद ट्रकमधून बांगलादेशच्या सीमेपर्यंत गोवंश पोहोचवण्यात यायचे. अकबर बंजारा आणि त्याचा भाऊ सलमाननं गोमांस तस्करीतून मेरठ, बिजनोर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ३०० कोटींची संपत्ती गोळा केली.

अकबर बंजाराची उत्तर प्रदेशातील फलावदा परिसरात दहशत होती. त्यांच्या गुंडगिरीमुळे अनेक जण त्रासले होते. योगी सरकार आल्यानंतरही अकबरचा गोमांस तस्करीचा व्यवसाय सुरुच होता. अकबरला नेमकं कोणाचं संरक्षण होतं याचा तपास सुरू आहे. अकबरच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र लिहिलं होतं.