शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

उत्तर प्रदेशच्या दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर; तब्बल ३०० कोटींचे होते मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:07 IST

प्रचंड दहशत असलेल्या दोन गोतस्कर भावांचा पोलिसांकडून एन्काऊंटर; एकावर होतं २ लाखांचं बक्षीस

गुवाहाटी: उत्तर प्रदेशातील दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. दोघे मेरठचे रहिवासी होते. १३ एप्रिलला दोघांना अटक झाली. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. १४ एप्रिलला त्यांना आसामच्या कोकराझारमध्ये आणण्यात आलं. एन्काऊंटर दरम्यान चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

अकबर बंजारा आणि सलमान अशी एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या गोतस्करांची नावं आहेत. अकबर बंजारावर २ लाख रुपयांचं बक्षीस होतं. उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर आसाम पोलिसांनी दोन्ही गोतस्करांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली. अकबर बंजारा आणि सलमान मंगळवारी पोलीस कोठडीतून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.

कोकराझारमध्ये गोतस्कर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन्ही तस्कर मारले गेले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. अकबरनं तस्करीच्या उद्योगाचा विस्तार आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मिझोरमपर्यंत केला होता. बंद ट्रकमधून बांगलादेशच्या सीमेपर्यंत गोवंश पोहोचवण्यात यायचे. अकबर बंजारा आणि त्याचा भाऊ सलमाननं गोमांस तस्करीतून मेरठ, बिजनोर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ३०० कोटींची संपत्ती गोळा केली.

अकबर बंजाराची उत्तर प्रदेशातील फलावदा परिसरात दहशत होती. त्यांच्या गुंडगिरीमुळे अनेक जण त्रासले होते. योगी सरकार आल्यानंतरही अकबरचा गोमांस तस्करीचा व्यवसाय सुरुच होता. अकबरला नेमकं कोणाचं संरक्षण होतं याचा तपास सुरू आहे. अकबरच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र लिहिलं होतं.