शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

प्रेमासाठी बांगलादेशीला बनवले ‘पाटलीण बाई’; नावानेच केला उलगडा अन् प्रियकराची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:04 IST

अश्लील  फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या  रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिललाइन पोलिसांनी सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली.

जितेंद्र कालेकरठाणे - बांगलादेशी महिलेच्या प्रेमात पडलेल्या अरविंद बर्डे याने तिला भारतीय करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधी पश्चिम बंगालमधील शाळेचे आणि ग्रामपंचायतीचे दाखले मिळवून दिले. ते देताना तिला चक्क अंजली राजाराम पाटील हे नाव दिले. पुढे तिच्याशी लग्न करून तिला अंजली बर्डे करणाऱ्या अरविंदला अखेर ठाणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मुंबई विमानतळावर बेड्या ठोकल्या. तीन मुलांसह भारतात छुप्या मार्गाने आलेल्या अंजलीचा मुलांसह त्याने  स्वीकार केला. त्यांचीही त्याने भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत उघड झाले.

अश्लील  फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या  रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिललाइन पोलिसांनी सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली. तिच्याच चौकशीमध्ये तिची आई अंजली, बहीण रितू आणि भाऊ रवींद्र यांच्यासह बांगलादेशातून चौघे भारतात बेकायदा आल्याची बाब उघड झाली. रियाला अंबरनाथच्या नेवाळी फाटा येथील अरविंदनेच बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी मदत केली. बांगलादेशी असलेल्या तिच्या आईशी त्याने २०१३ मध्ये लग्नही केले. बांगलादेशातून आलेल्या अंजली आणि तिच्या मुलांना प. बंगालमधून भारतीय नागरिक असल्याचे शाळेचे दाखले, जन्माचा दाखला देत अंजली राजाराम पाटील या नावाने कागदपत्रेही तयार केली. प. बंगालमध्ये अंजली राजाराम पाटील हे नाव कसे आले? त्यानंतर एकदम अंजली बर्डे असे नाव कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाले? या सर्वच चौकशीतून अरविंदनेच बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना मदत केल्याचे उघडकीस आले.  

अरविंद, अंजलीविरुद्ध लूक आउट नोटीसया सर्वच चौकशीतून अरविंद यानेच बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना  मदत केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी अरविंद आणि अंजली यांच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली. त्याच आधारे नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर ३१ जानेवारी रोजी  पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या  पथकाने त्याला अटक केली.

...अशी तयार केली बनावट कागदपत्रेनेवाळी भागात अरविंदची २००० मध्ये या बांगलादेशी महिलेशी ओळख झाली. तिच्या प्रेमात पडलेल्या अरविंदने तिला आधी प. बंगालची कागदपत्रे तयार करून दिली. तिच्याशी लग्न केल्यावर अमरावतीच्या अचलपूर येथून जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच नागपूर  रिजनकडून चक्क पासपोर्टही मिळवून दिला. तिच्या अनुक्रमे २३ व २१ वर्षीय दोन मुली आणि १९ वर्षीय एक मुलगा यांना नवी मुंबईच्या नेरूळमधील एका शाळेत प्रवेशही मिळवून दिला.पुढे अंजलीची मुलगी रियाला पकडल्यानंतर या प्रेमप्रकरणातून घडलेल्या बनावट कागदपत्रांच्या अंजली पाटील ऊर्फ बर्डे प्रकरणाचा पर्दाफाश झाला. रियाला अटक झाल्यानंतर अरविंद आणि अंजली यांनी मात्र कतार देशात पलायन केले होते.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशthaneठाणे